AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: भारताला झटका, दुखापतीमुळे दोन प्रमुख खेळाडू टी-20 मालिकेतून बाहेर, महाराष्ट्राच्या खेळाडूला संधी

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 सीरीजआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी झाले आहेत.

IND vs WI: भारताला झटका, दुखापतीमुळे दोन प्रमुख खेळाडू टी-20  मालिकेतून बाहेर, महाराष्ट्राच्या खेळाडूला संधी
9 फेब्रुवारीला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात लढत होणार आहे. या मालिकेची सुरुवात व्हायला आता काही दिवसच बाकी असताना भारतीय संघ कसून सराव करताना दिसून आला आहे. (फोटो साभार - twitter/bcci)
| Updated on: Feb 11, 2022 | 9:07 PM
Share

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी टी 20 सीरीजआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचे दोन प्रमुख खेळाडू या मालिकेत खेळू शकणार नाहीत. उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि अक्षर पटेल (Axar patel) फिटनेसमुळे टी-20 सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीत. राहुलला दुसऱ्या वनडे दरम्यान दुखापत झाली होती. अक्सर पटेल कोरोनामधून  सावरतोय. “9 फेब्रुवारीला दुसऱ्या वनडे दरम्यान उपकर्णधार केएल राहुलला दुखापत झाली होती. अक्सर पटेल कोरोनामधून सावरतोय. दोघेही आपल्या फिटनेसवर काम करण्यासाठी आता बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत जातील” असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) या दोघांच्या जागी नव्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि ऑलराऊंडर दीपक हुड्डाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

या दोन खेळाडूंना मिळाली जागा ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुड्डा दोघेही वनडे सीरीजचा भाग होते. ऋतुराजला वनडे सीरीजआधी कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. दीपक हुड्डाने याच मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने दोन्ही वनडेमध्ये समाधानकारक कामगिरी केली आहे.

श्रीलंका सीरीजद्वारे करु शकतात पुनरागमन केएल राहुल फक्त दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळला. बहिणीच्या लग्नामुळे तो पहिल्या वनडेमध्ये नव्हता. दुसऱ्या वनडेत त्याने 49 धावांची खेळी केली. दुखापतीमुळे आजच्या तिसऱ्या वनडेत तो खेळू शकला नाही. राहुल आणि अक्सर महिनाअखेरीस श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेद्वारे पुनरागमन करु शकतात.

टी20 सीरीजसाठी भारतीय टीम रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड़ आणि दीपक हुड्डा.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.