AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Murli Vijay: 2 वर्षानंतर मैदानात परतलेला मुरली विजय पुनरागमनाच्या सामन्यात सपशेल फेल

एकवेळ भारताच्या कसोटी संघाचा (Test Team) महत्त्वाचा भाग राहिलेला सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) दोन वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं.

Murli Vijay: 2 वर्षानंतर मैदानात परतलेला मुरली विजय पुनरागमनाच्या सामन्यात सपशेल फेल
murli vijayImage Credit source: instagram
| Updated on: Jun 25, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई: एकवेळ भारताच्या कसोटी संघाचा (Test Team) महत्त्वाचा भाग राहिलेला सलामीवीर मुरली विजयने (Murli Vijay) दोन वर्षानंतर मैदानावर पुनरागमन केलं. त्याने तामिळनाडू प्रीमियर लीगमधून मैदानात पुनरागमन केलय. TNPL मध्ये शुक्रवारी डिंडिगुल ड्रॅगर्स आणि रुबी त्रिची वॉरियर्स मध्ये सामना झाला. या लीगमध्ये मुरली विजय रुबी त्रिची वॉरियर्ससाठी खेळतोय. विजयकडून पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी झाली नाही. तो फ्लॉप ठरला. व्यक्तीगत कारणांमुळे मुरली विजयने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. पुनरागमनाच्या सामन्यात त्याने खूप कमी धावा केल्या. तो फक्त 8 धावा करुन आऊट झाला. तो एकही चौकार मारु शकला नाही. दोन वर्षानंतर मुरली विजयच पुनरागमन दमदार होऊ शकलं नाही. या लीग मध्ये पुढच्या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे.

विजय शेवटचा सामना कधी खेळला होता?

मुरली विजयने या सामन्याआधी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल 2020 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. त्यावेळी तो महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. त्या सीजनमध्ये तो तीन आय़पीएल सामने खेळला होता. विजय बऱ्याचकाळापासून टीम इंडियात स्थान मिळवू शकलेला नाही. तो भारतासाठी पर्थ येथे 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

मुरली विजयचा संघ जिंकला

विजय फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असेल, पण त्याचा त्रिची वॉरियर्स संघ जिंकला. निद्धिश राजगोपालने या टीमसाठी अर्धशतक फटकावलं. त्यामुळे संघाला विजय मिळवता आला. त्याशिवाय आदित्य गणेशने 37 धावा केल्या. 145 धावांचा पाठलाग करणाऱ्या त्रिची वॉरियर्सने अमित सात्विकचा विकेट लवकर गमावला होता. त्याने 15 चेंडूत 28 धावा केल्या. आपल्या डावात त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. त्यानंतर विजय आऊट झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर त्रिची वॉरियर्स संघाला झटका लागला नाही. राजगोपाल आणि गणेशने तिसऱ्याविकेसाठी 114 धावांची भागीदारी केली. राजगोपालने 48 चेंडूंचा सामना करताना, सहा चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने नाबाद 64 धावा केल्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.