Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण…’, कोहलीच्या सुट्टीवर अझरुद्दीनचं रोखठोक मत

जानेवारी महिन्यात कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) ब्रेक मागितला आहे. कोहलीच्या मुलीचा जानेवारी मध्ये वाढदिवस आहे.

'ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण...', कोहलीच्या सुट्टीवर अझरुद्दीनचं रोखठोक मत
रोहीत शर्माच्या निवडीवर दिलीप वेंगसरकर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 5:04 PM

नवी दिल्ली: “ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही, पण वेळ योग्य असली पाहिजे” असं मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने (Mohammed Azharuddin) व्यक्त केलं आहे. विराट कोहलीने (Virat kohli) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अझरुद्दीनने हे मत व्यक्त केलं आहे. जानेवारीमहिन्यात कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) ब्रेक मागितला आहे.

कोहलीच्या मुलीचा वाढदिवस 

कोहलीच्या मुलीचा जानेवारी मध्ये वाढदिवस आहे. विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका येत्या ११ जानेवारीला एक वर्षाची होणार आहे. कोहलीची माघार हा भारतासाठी दुहेरी झटका आहे. कारण आधीच रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाहीय. येत्या २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

…म्हणून मतभेदांच्या चर्चांना बळकटी मिळते 

“एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं विराट कोहलीने कळवलं आहे. रोहित शर्मा सुद्धा कसोटीमध्ये खेळणार नाहीय. ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही. पण वेळ योग्य असली पाहिजे. या अशा घडामोडी मतभेदांच्या चर्चांना अधिक बळकटी देणाऱ्या आहेत” असं मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

टी-२०, वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे होते. पण कोहलीकडे आता कसोटी संघाचे कर्णधारपद आहे. टी-२० आणि वनडेच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. विराट आणि रोहित दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे आधारस्तंभ आहेत. आतापर्यंत दोघांनी अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. अनेक विक्रम दोघांच्या नावावर आहेत. पण या दोन्ही प्रतिभावन खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार सुरु असतात.

आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमुळे पुन्हा एकदा या चर्चांनी जोर पकडला आहे. कोहलीने बीसीसीआयकडे जानेवारीत छोटा ब्रेक मागितल्याचे सूत्रांनी एएनआयला सांगितले. दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. सराव करताना रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली होती. स्पेशालिस्ट रघूचा चेंडू रोहित शर्माला लागला होता. रोहितच्या जागी कसोटी मालिकेसाठी प्रियांक पांचाळची संघात निवड झाली आहे.

संबंधित बातम्या 

Priyank Panchal : रोहित शर्माची जागा घेणारा प्रियांक पांचाळ नेमका कोण? दक्षिण आफ्रिकेचं तिकीट मिळण्याचं कारण काय?

Kuldeep Yadav : टीम इंडियाचा चायनामन कुलदीप यादव निघालेला आत्महत्या करायला? नेमकं कारण काय?

IndvsSA : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्के सुरुच; कोहलीची माघार, रोहित शर्माबद्दल संभ्रम, नेतृत्व कुणाकडे?

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.