Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Captain Resign : भारत-श्रीलंका सीरीजची घोषणा, कॅप्टनने घेतला राजीनाम्याचा निर्णय, टीमला मोठा धक्का

Indis vs Srilanka : टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील सीरीजची घोषणा झाली आहे. येत्या 26 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होत आहे. मात्र त्याआधीच कॅप्टनने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Captain Resign : भारत-श्रीलंका सीरीजची घोषणा, कॅप्टनने घेतला राजीनाम्याचा निर्णय, टीमला मोठा धक्का
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 7:38 PM

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमवता वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताने 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाला रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्त्वात वर्ल्ड कप जिंकून दिला. टीम इंडियाचे मुख्य कोच राहुल द्रविड याचा आता कार्यकाल संपला आहे. तर माजी खेळाडू गौतम गंभीर याची बीसीसीआयने मुख्य हेडकोचपदी नियुक्ती केली आहे. टीम इंडिया कोच म्हणून गंभीरच्या नेतृत्त्वात श्रीलंका दौरा करणार आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीमच्या कॅप्टटनने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वन डे मालिका होणार आहे. यामधील पहिला टी-20सामना 26जुलैपासून टी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे.  त्याआधी श्रीलंका संघाचा कर्णधार वानिंदू हसरंगा याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे.

  • पहिला T20I – 26 जुलै 2024
  • दुसरी T20I – 27 जुलै 2024
  • तिसरा T20I – 29 जुलै 2024
  • पहिला एकदिवसीय सामना – 1 ऑगस्ट, 2024
  • दुसरा एकदिवसीय सामना – 4 ऑगस्ट, 2024
  • तिसरा एकदिवसीय सामना – 7 ऑगस्ट 2024

2024 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका संघाची खराब कामगिरी राहिली होती. 2014 साली विजेतेपद जिंकणारा श्रीलंका संघ पहिल्याच फेरीमधून बाहेर पडला होता. त्यानंतर श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कोच ख्रिस सिल्व्हरवुड आणि सल्लागार प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपला राजीनामा दिला होता. आती टीम इंडियाविरूद्धच्या टी-20 मालिकेला काही दिवस बाकी असताना हसरंगाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.