AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेल्मेट आपटलं..पंचांसोबत वाद..कोचही आला मैदानात! विराट कोहलीमुळे श्रीलंकेत झाला राडा

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताची स्थिती नाजूक झाली. एकट्या जेफ्रेने निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला. यामुळे भारतीय संघ अडचणीत आला. पण विराट कोहलीमुळे वेगळ्याच वादाला फोडणी मिळाली. यामुळे श्रीलंकेचे खेळाडू चांगलेच तापल्याचं दिसले. नेमकं असं मैदानात काय झालं ते जाणून घ्या.

हेल्मेट आपटलं..पंचांसोबत वाद..कोचही आला मैदानात! विराट कोहलीमुळे श्रीलंकेत झाला राडा
Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 04, 2024 | 9:34 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघाने विजयासाठी जोर लावला होता. श्रीलंकेने 50 षटकात 9 गडी गमवून 240 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. रोहित शर्माने आक्रमक खेळी करून टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर हे आव्हान गाठताना टीम इंडियाची गाडी रुळावरून घसरली. असं असताना या सामन्यादरम्यान एका वादाला फोडणी मिळाली. टी20 मालिका निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर आता वनडे सामन्यात वाद पाहायला मिळाला. श्रीलंकेचे खेळाडू दुसऱ्या सामन्यात चांगले संतापलेले दिसले. या वादाचं कारण ठरला तो विराट कोहली..पण हा वाद काय विराट कोहलीशी नव्हता तर पंचांच्या निर्णयाशी होता. विराट कोहली तर फलंदाजी करत होता. चला जाणून घेऊयात नेमकं काय झालं ते..

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. त्याच्याकडून या सामन्यात खरं तर चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. कोहली मैदानात येताच त्याने दोन चौकार मारत आपला हेतू स्पष्ट केला होता. पण दुसऱ्या चौकारानंतर भलतंच घडलं. फिरकीपटू अकिला धनंजया षटकातील शेवटचा चेंडू टाकत होता. त्या चेंडूवर एलबीडब्ल्यूसाठी अपील झाली. तेव्हा पंचांनी त्याला बाद असल्याचं घोषित केलं. पण विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला आणि वादाला सुरुवात झाली.

रिप्लेत चेंडू विराट कोहलीच्या बॅटच्या अगदी जवळ होता. तेव्हाच स्नीकोमीटरमध्ये आवाजाची नोंद झाली. त्यामुळे बॅटला लागून चेंडू पॅडला लागल्याचं त्यावरून सिद्ध होत होतं. त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे निर्णय बदलण्याशिवाय काही पर्याय नव्हता. हा निर्णय येताच श्रीलंकेचे खेळाडू भडकले. इतकंच काय तर पंचांशी वाद देखील घातला. विकेटकीपर कुसल मेंडिसने हेल्मेट काढून जमिनीवर आपटलं. कर्णधार चरिथ असलंकाही पंचांशी निर्णयावरून वाद घालू लागला. श्रीलंकेचा कोच सनथ जयसूर्या ड्रेसिंग रुममधून मैदानात आला आणि बाउंड्रीवरील चौथ्या पंचांना प्रश्न विचारू लागला. यावेळी श्रीलंकन खेळाडू कोहलीला काहीतरी विचारू लागले, पण कोहलीन फक्त हसला आणि काहीच बोलला नाही. दरम्यान, विराट कोहली काही खास करू शकला नाही. 19 चेंडूत 14 धावा करून बाद झाला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.