AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli याची टीम इंडियाच्या विजयानंतर जाहीर माफी, नक्की काय झालं?

Virat Kohli Apologized | विराटने टीम इंडिया विजयात सर्वाधिक योगदान दिलं. विराटने सर्वाधिक नाबाद 103 धावा केल्या. त्यानंतरही विराटने सर्वांसमोर माफी का मागितली? जाणून घ्या.

Virat Kohli याची टीम इंडियाच्या विजयानंतर जाहीर माफी, नक्की काय झालं?
वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करण्याता रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वन डे क्रिकेटमध्ये 48 शतके केली आहे. हा विक्रम मोडण्यापासून सचिन अवघी दोन शतके दूर आहे. विराट हा विक्रम कधी मोडणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
| Updated on: Oct 19, 2023 | 11:34 PM
Share

पुणे | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 17 वा सामना जिंकला आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय ठरला. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 257 धावांचं आव्हान हे 41.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 48 धावा केल्या. शुबमन गिल याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. श्रेयस अय्यर याने 19 धावांचं योगदान दिलं. तर केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंच पोहचवलं.

केएल राहुल याने 34 बॉलमध्ये नाबाद 34 धावा केल्या. तर विराट कोहली याने विजयी षटकारासह शतकही पूर्ण केलं. विराटने 97 बॉलमध्ये 103 धावांची खेळी केली. विराटचं हे 48 वं वनडे शतक ठरलं. विराटला या शतकी खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. विराटने या खेळीनंतर जाहीर माफी मागितली. नक्की काय झालं आणि काय नाय हे जाणून घेऊयात.

विराटने कुणाची माफी मागितली?

विराटने रवींद्र जडेजा याची माफी मागितली. विराटने शतक ठोकल्याने त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. यामुळे जडेजाची संधी हुतली. जडेजाने 10 ओव्हरमध्ये 38 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे जडेजा मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार होता. विराट कोहली सामन्यानंतर प्रोस्ट प्रोडक्शन शो दरम्यान काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

विराट काय म्हणाला?

“जडेजाकडून मॅन ऑफ द मॅच हिसकावस्यासाठी क्षमस्व. टीमसाठी मोठं योगदान देण्याची इच्छा होती. वर्ल्ड कपमध्ये माझा नावावर अर्धशतकं आहेत. मात्र मी त्याचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरलो. मी अखेरपर्यंत मैदानात उभा राहून टीमला जिंकवू इच्छित होतो, जे मी गेल्या अनेक वर्षांसून करत आलोय”, असं विराट म्हणाला.

विराटकडून जडेजाची माफी

बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास, तंझिद हसन, मेहदी हसन मिराज, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान आणि शरीफुल इस्लाम.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.