AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | “तर टीम इंडियाला कसोटी मालिकेत 4-0 च्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागेल”

कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

India vs Australia 2020 | तर टीम इंडियाला कसोटी मालिकेत 4-0 च्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागेल
| Updated on: Nov 24, 2020 | 5:15 PM
Share

सिडनी : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची (India Tour Australia 2020) सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. या एकदिवसीय सामन्यांनंतर टी 20 मालिका खेळण्यात येणार आहे. एकदिवसीय आणि टी 20 च्या तुलनेत क्रिकेटचाहत्यांचं लक्ष हे कसोटी मालिकेकडे लागलेले आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ही प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे या कसोटी मालिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने (Michael Clarke) या कसोटी मालिकेबद्दल मोठं विधान केलं आहे. “टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत विजय मिळवला नाही, तर टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा 4-0 च्या फरकाने पराभव होईल”, अशी भविष्यवाणी क्लार्कने केली आहे. sky sports radio सोबत बोलताना क्लार्कने हे विधान केलं आहे. india vs australia 2020 team india will have to face a 4-0 defeat in the test series said former australia captain michael clarke

क्लार्क काय म्हणाला?

टीम इंडियाला एकदिवसीय आणि टी 20 मालिकेपासूनच विजयी लय प्राप्त करायली हवी. कर्णधार विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतील सामन्यात विजय मिळवून द्यावा. असं न झाल्यास टीम इंडिया दबावात येईल. या दबावाचा परिणाम कसोटी मालिकेदरम्यान दिसेल. तसेच विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे टीम इंडिया विराटच्या अनुपस्थितीत 3 कसोटी सामन्यात अडचणीत येईल. त्यामुळे टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी 20 मालिकेपासून विजयी लय पकडायला हवी. जर टीम इंडियाला हा विजयी सूर गवसला नाही, तर कसोटी मालिकेतील सर्वच्या सर्व म्हणजेच 4 सामन्यांमध्ये टीम इंडिया पराभूत होईल”, असंही क्लार्क म्हणाला.

विराट कसोटी मालिकेतील पहिलाच सामना खेळणार आहे. यानंतर विराट भारतात परतणार आहे. विराट बाबा होणार असल्याने बीसीसीआयने त्याला पालक्त्वाची रजा मंजूर केली आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

रोहित-इशांत कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

रोहित शर्मा आणि इशांत शर्मा हे दोघे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इशांत आणि रोहितच्या दुखापतीत अपेक्षित अशी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणं आतातरी अशक्य वाटतंय. यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत अजून भर पडली आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. यानंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाने मागील दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत पराभव केला होता. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचे संघात पुनरागमन झालं आहे. तसेच विराट, रोहित आणि इशांत हे कसोटीमध्ये खेळणार नसल्याने टीम इंडियासमोर कांगारुंचे कडवे आव्हान असणार आहे.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या :

Kapil Dev ODI XI | टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय टीम

रोहित-इशांत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार? टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ

india vs australia 2020 team india will have to face a 4-0 defeat in the test series said former australia captain michael clarke

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.