AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 : उर्वरीत पाच सामने कोणत्याही दबावाशिवाय आणि भीतीशिवाय खेळण्याची गरज आहे – श्रेयस अय्यर

आम्ही खूप संथ सुरुवात केली आणि काही विकेट लवकर गमावल्या. सुरुवातीला विकेटमध्ये थोडी हालचाल होती. तरीही मला मान्य आहे की या विकेटवर आम्ही प्रथम फलंदाजी केली आणि कमी धावा केल्या.

IPL 2022 : उर्वरीत पाच सामने कोणत्याही दबावाशिवाय आणि भीतीशिवाय खेळण्याची गरज आहे - श्रेयस अय्यर
उर्वरीत पाच सामने कोणत्याही दबावाशिवाय आणि भीतीशिवाय खेळण्याची गरज आहेImage Credit source: twitter/ipl
| Updated on: Apr 29, 2022 | 11:11 AM
Share

मुंबई – आयपीएलमध्ये (IPL 2022) गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) पुन्हा एकदा पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्स (DC) ने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 गडी राखून पराभव केला. कोलकाताचा या मोसमातील हा सलग पाचवा पराभव ठरला. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर काहीसा निराश दिसला. त्याने आपल्या संघाची संथ सुरुवात आणि सुरुवातीलाच विकेट गमावणे हे पराभवाचे कारण सांगितले. यासोबतच या सलग पराभवानंतर संघाला काय करण्याची गरज आहे हेही सांगितले.

आमच्या खेळाचे विश्लेषण करावे लागेल

आम्ही खूप संथ सुरुवात केली आणि काही विकेट लवकर गमावल्या. सुरुवातीला विकेटमध्ये थोडी हालचाल होती. तरीही मला मान्य आहे की या विकेटवर आम्ही प्रथम फलंदाजी केली आणि कमी धावा केल्या. पूर्वार्धात आम्ही चांगला खेळ केला नाही. चूक कुठे होत आहे हे पाहण्यासाठी आम्हाला आमच्या खेळाचे विश्लेषण करावे लागेल. या सामन्यातही केकेआरच्या सलामीच्या जोडीत बदल झाला असं श्रेयस अय्यर म्हणाला. गेल्या काही सामन्यांपासून आम्ही आमची सलामीची जोडी फिक्स करू शकलो नाही. काही खेळाडूंना सामन्यांच्या मध्यभागी दुखापत झाल्याचे कारणही आहे. स्थिर फलंदाजी आणि गोलंदाजीची फळी राखणे कठीण झाले आहे. जेव्हा तुम्ही लीग खेळत असाल तेव्हा तुमच्याकडे सुरुवातीपासूनच फलंदाजी आणि गोलंदाजी यांचा चांगला मेळ असायला हवा असंही तो म्हणाला.

पाच सामने बाकी आहेत

‘आता आम्हाला कोणत्याही दबावाशिवाय आणि भीतीशिवाय सामना खेळण्याची गरज आहे. आमचे पाच सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या फ्रँचायझीसाठी सर्व शक्तीनिशी सामने जिंकावे लागतील. खेळाडूंना जास्त विचार करणे थांबवावे लागेल. आपण पुन्हा चांगली सुरुवात करूया. हे सर्व मानसिकतेवर अवलंबून असते. आता आपल्याला अतिआत्मविश्वास दाखवायला हवा. अशा वेळी तुमची चूक असली तरी हरकत नाही असं म्हणत श्रेयसने खेळाडूंना आधार दिला.

केकेआरचा हा सलग पाचवा पराभव

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 35 धावांत चार विकेट गमावल्या. नंतर कर्णधार श्रेयस अय्यर (42) आणि नितीश राणा (57) यांच्या खेळीमुळे कोलकाताचा संघ 146 धावा करू शकला. प्रत्युत्तरात दिल्लीनेही पहिले दोन विकेट लवकर गमावल्या. पण नंतर डेव्हिड वॉर्नर (42), ललित यादव (22), रोवमन पॉवेल (33) आणि अक्षर पटेल (24) यांच्या छोट्या खेळीने संघाला सहज विजय मिळवून दिला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.