AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन भारतीय क्रिकेटपटू अटकेत, मॅच फिक्सिंगप्रकरणी दिग्गज फलंदाजाकडून गुन्हा कबूल, क्रिकेट जगतात भूकंप

हा क्रिकेट जगताचा एक काळा अध्याय आहे ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं होतं. ज्यात स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तीन भारतीय क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली होती.

तीन भारतीय क्रिकेटपटू अटकेत, मॅच फिक्सिंगप्रकरणी दिग्गज फलंदाजाकडून गुन्हा कबूल, क्रिकेट जगतात भूकंप
Bangladesh Cricket
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 4:09 PM

मुंबई : हा क्रिकेट जगताचा एक काळा अध्याय आहे ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं होतं. ज्यात स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तीन भारतीय क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक खेळाडू असा होता ज्याने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघासह दोन विश्वचषक जिंकले होते. त्यातील एक दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये खेळवण्यात आलेला टी – 20 विश्वचषक आणि दुसरा 2011 साली भारतात खेळवण्यात आलेला एकदिवसीय वर्ल्ड कप. या दोन्ही स्पर्धांमध्ये तो खेळाडू भारतीय संघाचा शिलेदार होता. त्या खेळाडूचं नाव आहे एस. श्रीसंत, तर अजीत चंदीला आणि अंकित चव्‍हाण अशी उर्वरित दोन खेळाडूंची नावं आहेत. (Mohammad Ashraful admits about match fixing and spot fixing in bangladesh premier league in 2013)

2013 मध्ये घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण क्रिकेट जग हादरलं होतं. बांगलादेशी क्रिकेटमध्ये मोठा भूकंप आला होता. यावेळी एका दिग्गज फलंदाजानेही क्रिकेट खेळाला गालबोट लावलं होतं. ही घटना स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) आणि मॅच फिक्सिंगशीही (Match Fixing) संबंधित होती. बांगलादेशी क्रिकेटच्या इतिहासातील या काळ्या दिवसाची आज आठवण काढण्यामागे कारण आहे. आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (4 जून) ही घटना समोर आली होती. या प्रकरणात दोषी असलेल्या फलंदाजाने याच दिवशी आपला गुन्हा कबूल केला होता.

खरं तर तीन भारतीय क्रिकेटपटूंच्या अटकेनंतर स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात बांगलादेशचा फलंदाज मोहम्मद अशरफुल (Mohammad Ashraful) याचेही नाव समोर आले. त्यानंतर 4 जून 2013 ला बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये अशरफुलने स्पॉट फिक्सिंग आणि आणि मॅच फिक्सिंग प्रकरणात आपलाही सहभाग असल्याचे कबूल केले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने लाचलुचपत प्रतिबंधक आणि सुरक्षा युनिटचा अहवाल येईपर्यंत मोहम्मद अशरफुल याच्यावर कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळण्यास बंदी घातली. या प्रकरणात, बांगलादेशी फलंदाजावर आठ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. नंतर त्याची शिक्षा कमी करून पाच वर्षे करण्यात आली.

बांगलादेशच्या 61 कसोटी आणि 177 एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधीत्व

मोहम्‍मद अशरफुल हा बांगलादेशी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जायचा. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने 61 कसोटी, 23 टी-20 आणि 177 एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचं प्रतिनिधीत्व केलं होतं. 61 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 24 च्या सरासरीने 2737 धावा जमवल्या होत्या. त्यात 6 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. 190 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 177 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 22.23 सरासरीने आणि 3 शतकं तसेच 20 अर्धशतकांच्या मदतीने 3468 धावा जमवल्या आहेत. तसेच 23 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 19.56 च्या सरासरीने आणि 2 अर्धशतकांच्या 450 धावा जमवल्या आहेत. गोलंदाजीतही त्याने बरी कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर कसोटीत 21, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 आणि टी-20 मध्ये 8 बळी आहेत.

इतर बातम्या

रोहित शर्मा की विराट कोहली, टी-20 बेस्ट बॅट्समन कोण? गावस्करांनी सांगितलं तिसरंच नाव!

इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूने म्हटलं, ‘मला झोप येत नाही!’

तो आला, त्याने इंग्लंडला झोडलं, पदार्पणात लॉर्ड्सवर षटकाराने दुहेरी शतक ठोकलं, कॉनवेचा वर्ल्ड रेकॉर्ड!

(Mohammad Ashraful admits about match fixing and spot fixing in bangladesh premier league in 2013)

'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर
फरार कृष्णा आंधळेचे पुरावे जिच्याकडे 'ती' महिला कोण? मोठी माहिती समोर.
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त
हल्ल्यानंतर भारतीय सैन्य अ‍ॅक्शनमोडमध्ये, दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त.
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य
सिंधूत पाणी वाहील किंवा..,मोदींच्या वॉटर स्ट्राईकनंतर भुट्टोचं वक्तव्य.
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ
दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये धास्ती, काश्मीरकडे पर्यटकांची पाठ.
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच...
पहलगाम हल्ल्यात आदिल, नजाकत अन् सज्जाद पर्यटकांसाठी ठरले देवदूतच....
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.