AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sreesanth | श्रीशांत तब्बल सात वर्षांनी मैदानात उतरण्यास सज्ज, केरळ रणजी संघात निवड

केरळच्या रणजी टीममध्ये श्रीशांतची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

Sreesanth | श्रीशांत तब्बल सात वर्षांनी मैदानात उतरण्यास सज्ज, केरळ रणजी संघात निवड
| Updated on: Jun 18, 2020 | 10:04 PM
Share

तिरुवनंतपूरम : स्पॉट फिक्सिंगप्रकरणातील जेलवारीनंतर बंदी (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team) घालण्यात आलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत तब्बल सात वर्षांनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. केरळच्या रणजी टीममध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात श्रीशांतवरील सात वर्षांच्या बंदीचा काळ पूर्ण होणार (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team) आहे.

श्रीशांतला इतक्या वर्षांनी पुन्हा मैदानावर उतरणं तितकंस सोपं नाही. श्रीशांत वयाची 38 वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे या वयात क्रिकेटच्या मैदानात जो फिटनेस आवश्यक आहे, तो गाठणं तितकंस सोपं नाही.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 2013 मध्ये बंदी

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात IPL 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती. त्याच्यासोबत अजित चंदेला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.

फिटसेन सिद्ध करुन पुन्हा खेळणार : श्रीशांत

“मी केरळ क्रिकेट असोसिएशनचा आभारी आहे. मी फिटसेन सिद्ध करुन पुन्हा खेळेन. आता सर्व वाद-विवाद विसरण्याची वेळ आली आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीशांतने दिली (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team).

केरळ क्रिकेट असोसिएशनची अधिकृत माहिती

केरळ क्रिकेट असोसिएशनने (Kerala Cricket Association) माजी वेगवान गोलंदाज टिनू योहानला संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीशांतला संघात घेतल्याची अधिकृत माहिती दिली. “श्रीशांत संघासाठी अत्यंत फायद्याचा ठरु शकतो. आम्ही त्याच्या स्वागतासाठी तयार आहोत. तो एक अनुभवी गोलंदाज आहे. फिटनेस सिद्ध करुन तो कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतो”, असं असोसिएशनने म्हटलं.

श्रीशांतवरील आजन्म बंदी मागे

2018 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने श्रीशांतवरील आजन्म बंदी मागे घेतली. सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये ही बंदी कायम ठेवली होती. मात्र, बीसीसीआयने या बंदीची मर्यादा कमी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर श्रीशांतवरील आजन्म बंदीला सात वर्षांवर आणण्यात आलं.

श्रीशांतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

श्रीशांतने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली. श्रीशांतने 53 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 53 सामन्यांमध्ये त्याने 75 विकेट्स घेतल्या. त्याशिवाय, 2006 मध्ये त्याने कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण केलं. त्याने 27 कसोटी सामन्यांमध्ये 87 विकेट्स घेतल्या. श्रीशांत 2007 मध्ये टी-20 विश्व चषक आणि 2011 मधील विश्वचषक जिंकणाऱ्या संघातही होता (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team).

संबंधित बातम्या :

Ishant Sharma | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलेल्या नियमावर इशांत आणि चहलची नाराजी

पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप

ऑस्ट्रेलियाने रणशिंग फुंकले, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.