AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार! दुसऱ्या कसोटी विजयामुळे असं बदललं गणित

World Test Championship: भारताने दुसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच आपल्या खिशात घातला. यामुळे भारतीय संघानं आयसीसी टेस्ट गुणतालिकेत आपली स्थिती कायम ठेवली आहे. भारताने कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार! दुसऱ्या कसोटी विजयामुळे असं बदललं गणित
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताची आगेकूच, आयसीसी गुणतालिकेत असा पडला फरक Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 19, 2023 | 2:23 PM
Share

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील सलग दुसरा कसोटी सामना भारताने आपल्या खिशात घातला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना भारताने 6 गडी राखून जिंकला आहे. मोठ्या विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फक्त दोन अंकांचा फरक पडला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार असंच चित्र दिसत आहे. आयससीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर भारतानं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला ही कसोटी मालिका 3-0 ने जिंकायची आहे. भारतासाठी तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा आहे.

आयसीसी गुणतालिका आणि गणित

ऑस्ट्रेलिया 66.67 गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या कसोटीतील पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या गुणांवर मात्र फरक पडला. पण मालिका पराभूत झाल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या स्थानी येऊ शकते. भारत 64.06 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 नं जिंकायची आहे. तिसऱ्या स्थानी 53.33 गुणांसह श्रीलंका आहे. तर चौथ्या स्थानी 48.72 गुणांसह दक्षिण आफ्रिका आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमवल्यास श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या पराभवावर गणित अवलंबून असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप उरलेले सामने

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (तिसरा कसोटी सामना) – होळकर स्टेडियम, इंदौर, भारत, 1-5 मार्च
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चौथा कसोटी सामना) – अहमदाबाद, भारत, 9-13 मार्च
  • दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्टइंडीज (पहिला कसोटी सामना) – सेंचुरियन, दक्षिण अफ्रीका, 28 फेब्रुवारी-4 मार्च
  • दक्षिण अफ्रीका विरुद्ध वेस्ट इंडीज (दुसरा कसोटी सामना) – जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रीका, 8-12 मार्च
  • न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (पहिला कसोटी सामना) – क्राइस्टचर्च, न्यूजीलँड, 9-13 मार्च
  • न्यूझीलँड विरुद्ध श्रीलंका (दुसरा कसोटी सामना) – वेलिंगटन, न्यूजीलँड, 17-21 मार्च

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरीची तारीख

फायनल मॅचचं आयोजन हे 7 ते 11 जूनदरम्यान करण्यात आलं आहे. सामन्यात कोणत्याही कारणाने व्यत्यय आल्याने वेळ वाया जातो. आयसीसीने असं झाल्याने दोन्ही संघांचं नुकसान होऊ नये, यासाठी 1 राखीव दिवसही ठेवला आहे. जून 12 हा राखीव दिवस ठेवला आहे.

दुसरा कसोटी सामन्यातील विजय

दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच सर्वबाद 263 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने 262 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका धावेची आघाडी होती.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अक्षरश:ढेपाळली. ऑस्ट्रेलियाने 113 धावा आणि 1 धाव मिळून एकूण 114 धावा केल्या.भारतासमोर विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 4 गडी गमवून तिसऱ्या दिवशीच पूर्ण केलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.