AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2G, 3G, 4G या 5G… तुमच्या भागात टेलीकॉम कंपनीची कोणती सर्व्हीस, आता समजून घेणे सोपे, फ्रॉड यूआरएल होणार बंद

Telecom Regulatory Authority of India (TRAI) : टेलिकॉम कंपन्या 1 ऑक्टोंबरपासून केवळ सुरक्षित असलेल्या यूआरएल किंवा ओटीपीच पाठवू शकणार आहेत. तसेच 140 सीरीजने सुरु होणारे सर्व टेलीमार्केटींग कॉल डिजिटल लेझर प्लॅटफॉर्मवर स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे त्याच्यांवर देखरेख करणे सोपे होणार आहे.

2G, 3G, 4G या 5G... तुमच्या भागात टेलीकॉम कंपनीची कोणती सर्व्हीस, आता समजून घेणे सोपे, फ्रॉड यूआरएल होणार बंद
telecom companies new rule
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 12:29 PM

मोबाईल आता प्रत्येकाच्या हातात नाही तर प्रत्येकाच्या घरात आला आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा टेलिकॉम कंपन्यांनी सुरु केली आहे. तसेच काही भागांतमध्ये अजूनही 2G सेवा सुरु आहे. आपल्या भागात 2G, 3G, 4G किंवा 5G कोणती सेवा आहे, त्याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. परंतु आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार आहे. ग्राहकांना 2G, 3G, 4G किंवा 5G कोणती सेवा दिली जात आहे, त्याची माहिती मिळणार आहे. नवीन नियमांनुसार, सर्व टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती देणे अनिवार्य केले आहे.

वेबसाइटवर देणार माहिती

टेलिकॉम कंपन्या एखाद्या शहरात 5G सेवा देतात. परंतु काही ठिकाणी फक्त 2G सेवा प्रदान करते. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्या त्यांच्या सेवेच्या गुणवत्तेशी संबंधित अनेक पॅरामीटर्सची माहिती त्यांच्या वेबसाइटवर देतील. आतापर्यंत ही माहिती टेलिकॉम कंपन्यांकडून सार्वजनिकरित्या दिली जात नव्हती.

1 ऑक्टोंबरपासून हे बदल

टेलिकॉम कंपन्या 1 ऑक्टोंबरपासून केवळ सुरक्षित असलेल्या यूआरएल किंवा ओटीपीच पाठवू शकणार आहेत. तसेच 140 सीरीजने सुरु होणारे सर्व टेलीमार्केटींग कॉल डिजिटल लेझर प्लॅटफॉर्मवर स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे त्याच्यांवर देखरेख करणे सोपे होणार आहे. नवीन ग्राहकांसाठी हे नियम फायदेशीर असणार आहे. त्यामुळे त्यांच्या भागात कोणती सेवा मिळत आहे, त्याची माहिती त्यांना सहज उपलब्ध होणार आहे. तसेच टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्क सुधारावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

सर्व मोबाईल कंपन्यांना नियंत्रित करण्याचे काम ट्रायकडून केले जाते. आता ट्रायने सर्व कंपन्यांना ऑनलाईन सेवेत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार मोबाइल टेलीफोन सेवा नियम 2009, वायरलेस डेटा गुणवत्ता नियम 2012 आणि ब्रॉडबँड सेवा नियम 2006 एकाच ठिकाणी आणला गेला आहे. एक ऑक्टोंबरपासून हे सर्व बदल लागू करण्यात आले आहे.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.