AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओभारत फोनवर UPI ने पेमेंट केल्याचा फ्री अलर्ट, जियो साऊंड पे सर्व्हीस लाँच, होणार इतक्या पैशांची बचत

आम्ही भारतीयांच्या भावनांचा उत्सव साजरा करीत असून एक सच्च्या डिजिटल भारताची निर्मिती करण्याच्या ध्यैयाची प्रेरित असल्याचे जिओचे अध्यक्ष सुनील दत्त यांनी म्हटले आहे.

जिओभारत फोनवर UPI ने पेमेंट केल्याचा फ्री अलर्ट, जियो साऊंड पे सर्व्हीस लाँच, होणार इतक्या पैशांची बचत
| Updated on: Jan 24, 2025 | 8:32 PM
Share

येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओ साऊंड पे सर्व्हीस लाँच करणार आहे. ही सुविधा जिओभारत कोनवर आजीवन फ्री मिळणार आहे. वास्तविक जिओ साऊंडपे सुविधेवर कोणत्याही साऊंड बॉक्स शिवाय युपीआय पेमेंटचा अलर्ट मिळणार आहे. कोणत्याही मोबाईलवर उपलब्ध होणारी ही भारतातील पहीली सुविधा असणार आहे. देशातील 5 कोटीहून अधिक छोटे उद्योजक आणि छोटे व्यापारी यांना या सुविधेचा थेट लाभ होणार असून त्यांची पैशांची बचत होणार आहे.

जिओ साऊंड  पे एक अभूतपूर्व इनोव्हेशन आहे. जे युपीआयच्या पेमेंटचे तात्काळ, विविध भाषेत ऑडिओ अलर्ट मॅसेज देणार आहे. त्यामुळे ज्यांचे छोटी किराणा मालाची दुकाने आहेत किंवा भाजीची मंडई आहे किंवा रस्त्यावरील फेरीवाले यांचा व्यवसाय करणे त्यांना या सुविधेमुळे सोपे होणार आहे. सध्या लघु, सुक्ष्म व्यापारी साऊंड बॉक्ससाठी दर महिन्यास १२५ रुपये देऊन साऊंड पे सुविधा घेत आहेत. आता ही सेवा जिओ साऊंडपेवर मोफत मिळणार आहे. त्यामुळे जिओभारत फोनचा वापर करणाऱ्याची वर्षाला १,५०० रुपयांची बचत होणार आहे.

जिओ भारत फोन सुमारे वर्षभरापूर्वी लाँच केला होता, हा जगातील सर्वात स्वस्त 4G फोन मानला जात आहे,त्याची किंमत केवळ ६९९ रुपये आहे. या नवीन योजनेआधारे कोणताही व्यापारी आता हा नवीन फोन विकत घेऊन सहा महिन्यात त्याची संपूर्ण किंमत वसुल करु शकणार आहे. भारताच्या प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिओने जिओ साऊंडपेवर ही सुविधा आणि वंदे मातरमची धुन ऐकायला मिळणार आहे.

जिओ प्रत्येक भारतीयाला सशक्त बनविण्यासाठी आणि त्याला तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी सज्ज आहे. जिओ भारत फोनवर मोफत जिओ साऊंडपे सुविधा आणि वंदे भारतच्या धुन मिळणार असल्याचे जिओचे अध्यक्ष सुनील दत्त यांनी म्हटले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.