Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आसामच्या नागावमध्ये पूरजन्य परिस्थिती, बांबूच्या सहाय्याने महिलेचं रेस्क्यू

आसाममधील नागावमधील कांपूरच्या अनेक भागात पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अश्या परिस्थितीत एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका महिलेला कळकावरून रेस्क्यु केल्याचं दिसत आहे.

Video : आसामच्या नागावमध्ये पूरजन्य परिस्थिती, बांबूच्या सहाय्याने महिलेचं रेस्क्यू
व्हायरल व्हीडिओImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 5:53 PM

मुंबई : सध्या जरी उन्हाळा सुरू असला तरी ईशान्य भारतात मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे आसाममध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील (Assam) नागावमधील (Nagaon Flood) अनेक भागात पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अश्या परिस्थितीत एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका महिलेला कळकावरून रेस्क्यु केल्याचं दिसत आहे. यात दोन पुरूष छाती इतक्या पाण्यातून या महिलेला घेऊन येताना दिसत आहेत. पाण्यातून बाहेर आणून तिला सोडतात. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

आसाममधील नागावमधील कांपूरच्या अनेक भागात पावसानंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. अश्या परिस्थितीत एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका महिलेला कळकावरून रेस्क्यु केल्याचं दिसत आहे. यात दोन पुरूष छाती इतक्या पाण्यातून या महिलेला घेऊन येताना दिसत आहेत. पाण्यातून बाहेर आणून तिला सोडतात. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

आसाममधील लुमडिंग-बदरपूर डोंगरी भागात रुळांवर पाणी साचल्याने दोन दिवसांपासून अडकलेल्या दोन गाड्यांमधील सुमारे 2800 प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम हवाई दल आणि इतर यंत्रणांच्या मदतीने करण्यात आलं आहे. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. शनिवारपासून संततधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याने हवाई दलाने अनेक प्रवाशांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. दिमा हासाओ जिल्ह्यातील NFR च्या लुमडिंग विभागात दोन गाड्या अडकल्या होत्या. हाफलांग महसूल विभागात भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि आसामच्या सात जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 57 जण मरण पावले आहेत, अशी माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

बाधितांपैकी 4,330 लोकांना सरकारने स्थापन केलेल्या 20 मदत शिबिरांमध्ये ठेवण्यात आलं आहे. विविध बाधित जिल्ह्यांमध्ये नऊ मदत वितरण केंद्रे कार्यरत आहेत. सध्याच्या पूरस्थितीत एकूण 10,321 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. एनएफआरच्या प्रवक्त्याने गुवाहाटीमध्ये सांगितले की शनिवारपासून विभागातील सुमारे 18 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि प्रभावित क्षेत्रातील 10 हून अधिक गाड्या काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संततधार पाऊस सुरू आहे. मात्र तरीही खराब झालेले रेल्वे रुळ दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.