Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Invest in gold : भारतात महागाईचा भडका; सोन्यात गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

भारतात महागाईचा भडका उडाला आहे. सोन्याच्या दरात देखील वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये सोन्यात गुंतवणूक करावी का? जाणून घेऊयात याबाबत तज्ज्ञ काय सांगतात.

Invest in gold : भारतात महागाईचा भडका; सोन्यात गुंतवणूक करावी का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:03 AM

मुंबई : अर्थव्यवस्थेबाबत (Economy) जेव्हा अनिश्चिततेची स्थिती निर्माण होते, तेव्हा सोन्याच्या किमती (Gold latest price) वाढू लागतात. सोन्याचे दर वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढती महागाई हे आहे. महागाई (Inflation) जेव्हा नियंत्रणाबाहेर वाढते तेव्हा देखील सोन्याच्या दरात तेजी येते. सध्या स्थितीमध्ये भारतात या दोन्ही गोष्टी पहायला मिळत आहेत. देशात सध्या महागाई सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. महागाई वाढत असल्याने जीडीपी घसरत आहे. अशा स्थितीमध्ये सोन्यात गुंतवणूक केल्यास ती अधिक फायदेशीर ठरू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितले की, महागाई वाढत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक चांगला पर्याय हा गुंतवणूकदारांपुढे असतो. तुम्ही मध्यम कालावधीसाठी सोन्यात गुंतवणुकीचा विचार करू शकता.

रेपो रेट वाढीचा दबाव

सध्या परिस्थितीमध्ये सोन्यात गुंतवणूक करावी का? याबाबत बोलताना अजय केडिया यांनी म्हटले आहे की, अमेरिकेची मे महिन्यातील महागाईची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. सध्या अमेरिकेत महागाई गेल्या 40 वर्षांतील उच्चस्थरावर पोहोचली आहे. महागाई वाढत असल्याने अमेरिकेवर व्याज दर वाढीचा दबाव आहे. चालू आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत व्याज दर 50 बेसिस पॉईंटने वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. रेपो रेट वाढल्यास सोन्या-चांदी सारख्या मौल्यवान धातुंच्या किमतीवर दबाव येतो. व त्या काहीकाळापर्यंत स्थिर राहातात. भारतात देखील गेल्या आठवड्यात रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. रेपो रेट वाढवल्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोन्याचे दर स्थिर असल्याचे पहायला मिळत आहेत. मात्र पुढील काळात त्यामध्ये वाढ होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय सांगतात?

सध्याची परिस्थिती पहाता सोन्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का? या प्रश्नाला उत्तर देताना केडिया यांनी म्हटले आहे की जेव्हा महागाई नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. इतिहासाचा अभ्यास केल्यास नियंत्रणाबाहेर गेलेली महागाई कंट्रोल करण्यासाठी कोणत्याही देशाला कमीत-कमी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागतो. तुम्ही जर या कालावधित सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर ती फायद्याची ठरू शकते. सध्या सोन्याचे दर प्रति तोळा 51 हजारांच्या आसपास आहेत. मात्र पुढील दोन, तीन महिन्यांत ते 53- 54 हजारांपर्यंत जाऊ शकतात. अशा स्थितीत सोन्यात केलेली अल्प कालावधीची गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.