AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँका आपल्याकडे कॅन्सल चेक का मागतात? त्यामुळे काही नुकसान होऊ शकते का?

बँकांसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करताना बँक आपल्याकडे कॅन्सल चेक का मागतात. कॅन्सल चेक घेण्यामागचा उद्देश काय असतो. जाणून घ्या.

बँका आपल्याकडे कॅन्सल चेक का मागतात? त्यामुळे काही नुकसान होऊ शकते का?
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 11:01 PM

मुंबई : कोणतेही कर्ज घेताना किंवा आर्थिक गोष्टी खरेदी करताना बँक आपल्याकडे कॅन्सल चेक मागतात. आपण तो सहजपणे देतो. पण तुम्हाला माहित आहे का की बँका तुमच्याकडून कॅन्सल चेक ( Cancelled Cheque ) का मागतात. हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल. तर चला मग जाणून घेऊया या मागचं कारण?

कॅन्सल चेक म्हणजे काय?

जेव्हा आपण बँकासोबत व्यवहार करतो तेव्हा वित्तीय सेवा प्रदाता कंपनी किंवा बँक आपल्याकडे रद्द केलेला चेक म्हणजेच कॅन्सल चेक मागते. त्या चेकवर मग आपण क्रॉस दोन रेषा मारुन त्यामध्ये कॅन्सल असं लिहून देतो.

बँका का मागतात कॅन्सल चेक?

ग्राहकाच्या तपशीलाची पडताळणी करण्यासाठी बँक आणि वित्तीय कंपन्या कॅन्सल चेक मागतात. कारण चेकवर ग्राहकाचे सर्व तपशील दिलेले असतात. जसे की बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पूर्ण नाव आणि स्वाक्षरी. जेणेकरून ग्राहकाचा तपशील सहजपण बँकांना पडताळणे सोपे होते.

कॅन्सल चेकने पैसे काढता येतात का?

रद्द केलेल्या चेकने तुमच्या खात्यातून कोणतीही रक्कम काढता येणार नाही. चेकवर क्रॉस मार्क योग्यरित्या करण्यासाठी तुम्हाला याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. रद्द केलेल्या चेकसाठी नेहमी निळ्या आणि काळ्या शाईचा पेन वापरावा.

रद्द केलेल्या चेकची गरज कुठे-कुठे आहे

विमा खरेदी करताना. डिमॅट खाते उघडण्याच्या वेळी. पीएफमधून ऑनलाइन पैसे काढताना. कोणतेही आर्थिक उत्पादन खरेदी करणे. NPS मध्ये गुंतवणूक करताना.

पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.