…तर तुमचा अन् आमचा विषय संपला, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला टोकाचा इशारा
मराठा आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं? याची माहिती 17 डिसेंबरपर्यंत द्या...नाहीतर आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर मराठा आरक्षणासाठी जानेवारी महिन्यात नवा कायदा करू, असा दावा बच्चू कडू यांनी केला. १७ डिसेंबरपर्यंत आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं हे सांगा नाहीतर...
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : मराठा आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं? याची माहिती 17 डिसेंबरपर्यंत द्या…नाहीतर आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर मराठा आरक्षणासाठी जानेवारी महिन्यात नवा कायदा करू, असा दावा बच्चू कडू यांनी केला. १७ डिसेंबरपर्यंत आंदोलनाचं काम कुठपर्यंत आलं हे सांगा नाहीतर एकदा रणनिती ठरवली आणि आंदोलनाला सुरूवात केली तर सरकारसोबत आपला संबंध नाही, अशी टोकाची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. उपोषण सोडवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे, उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे, बच्चू कडू यांच्यासोबत काय ठरलं होतं. याचा कागदही सार्वजिनक करण्याची तयारी जरांगे पाटील यांची आहे. तर दुसरीकडे ज्यांच्या कुणबी सापडणार नाही त्यांच्यासाठी नवा कायदा करणार असल्याचे दावा बच्चू कडू यांनी केलाय. बघा नेमकं काय म्हटलं आमदार बच्चू कडू यांनी…

रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?

माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले

हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?

'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
