नवी मुंबईतील ‘या’ भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय?

१२ ते १५ वयोगटातील मुलांचे अपहरण झाल्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या आहेत. नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे आणि कळंबोलीतील १२ ते १५ वयोगटातील मुलं अचानक बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय?
| Updated on: Dec 06, 2023 | 1:37 PM

रवी खरात, मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : नवी मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या ४८ तासात ६ अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, १२ ते १५ वयोगटातील मुलांचे अपहरण झाल्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल केल्या आहेत. नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे आणि कळंबोलीतील १२ ते १५ वयोगटातील मुलं अचानक बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे. या सहा बेपत्ता मुलांपैकी एकाचा शोध लागला आहे तर पाच जणांचा शोध अद्याप पोलिसांकडून सुरू आहे. तर नालासोपा-यात बेपत्ता असलेल्या ८ वर्षाच्या शाळकरी मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. हत्याकरून पाय बांधून गोणीत भरून फेकलेला मृतदेह दोनदिवसांपूर्वी मिळाला आहे. वसई फाटा येथील वाण्याचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूच्या एका नाल्याच्या बाजूच्या मोकळ्या रूममध्ये मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे परिसराता भितीचं वातावरण आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.