शिवरायांच्या पुतळ्यावर हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा किल्ले दुरुस्त करा, राज ठाकरे यांचे मोठे विधान
मनसे नेते राज ठाकरे हे व्हिजन वरळीमध्ये बोलताना दिसले. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक विषयाला हात घातला. राज ठाकरे यांनी किल्ले दुरुस्तबद्दल देखील मोठे भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी म्हटले की, शिवरायांच्या पुतळ्यावर हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा किल्ले दुरुस्त करा
नुकताच राज ठाकरे हे व्हिजन वरळीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी चाैफेर फटकेबाजी केली. हेच नाही तर राज ठाकरे यांनी म्हटले की, शिवरायांच्या पुतळ्यावर हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा किल्ले दुरुस्त करा. किल्ले दुरुस्तच्या विषयावर सरकारचे लक्ष केंद्रित राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र उभा करण्यासाठी दहा वर्षाचा विचार नसतो करायचा. 200 ते 500 वर्षाचा विचार करायचा असतो. दहा वर्षात काही होत नसतं. दहा वर्षात वाट लागते. आधीची मुंबई पाहिली असेल. त्या मुंबईला एक कॅरेक्टर होतं, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
Latest Videos
Latest News