AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, भाजपकडून लेखी आश्वासनासाठी शिवसेना आक्रमक

शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद (shiv sena Chief Minister ) मागितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, भाजपकडून लेखी आश्वासनासाठी शिवसेना आक्रमक
| Edited By: | Updated on: Oct 26, 2019 | 7:32 PM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजप 105 जागांसह मोठा पक्ष ठरला तर शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने (shiv sena Chief Minister ) भाजपला 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद (shiv sena Chief Minister ) मागितलं आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत तडजोड नाही, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. नवनिर्वाचित आमदारांनी सत्तेतील निर्णयाबाबतचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिले. मात्र उद्धव ठाकरेंनीही निर्णय आमदारांकडे सोपवला.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप अध्यक्ष अमित शाह ‘मातोश्री’वर आले होते. तेव्हा त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या सत्तास्थापनेचा 50-50 फॉर्म्युला ठरला होता. म्हणजे 144-144 जागा वाटपाचे सूत्र होते. पण भाजपची जागावाटपावेळी अडचण समजून घेतली. पण आता सत्तेत 50 टक्के वाटा हवा, भाजप नेत्यांनी ते आम्हाला लेखी मान्य करावं, म्हणजे भविष्यात कुठली अडचण किंवा वाद होणार नाहीत. हिंदुत्वाच्या आधारावर युती आहे, त्यामुळे युतीचे सरकार स्थापन व्हावे, अन्य उपलब्ध पर्यायांचा विचार करायला लागू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदारांची बैठक सुमारे 1 तास चालली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

शिवसेना आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी केलीय की जोपर्यंत भाजप 50-50 फॉर्म्युल्यानुसार भाजपचे वरिष्ठ नेते लिहून देत नाहीत, तोपर्यंत सरकार स्थापनेचा निर्णय होणार नाही, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.