AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसानंतर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील उत्पादनात तर घट होणारच आहे. पावसाचे सावट दूर होत असतानाच आता खरिपाच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यातील रेणापूर परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

पावसानंतर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 4:12 PM
Share

लातुर : मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील उत्पादनात तर घट होणारच आहे. पावसाचे सावट दूर होत असतानाच आता खरिपाच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यातील रेणापूर परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच खरिप पिक जोपसताना शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. गतवर्षी खरिप पिकांचे नुकसान होऊल देखील यंदा सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला होता. लातुरची बाजारपेठ आणि नगदी पिक म्हणून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देत आहे. मध्यंतरी पावसामुळे पिकाचे तर नुकसान झाले आहेच परंतु, आता ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

हवामानातील आर्द्रता वाढत असून बुरशी वाढीस वातावरण तयार झाल्याने सोयाबानची पाने ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी या परिसरात केवळ सोयाबीनचेच उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पिकाची फेरपालट ही गरजेची आहे. मात्र, उत्पादनापोटी शेतकरी हे सोयाबीनलाच पसंती देत आहेत. खरिप हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली होती. यानंतर किडीची प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी फवारणीची कामे करावी लागली होती. आता सोयाबीन बहरात असतानाच मुसळधार पाऊस आणि आता पावसाने उघडीप दिली तर किडीचा प्रादुर्भाव. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या पदरी नेमके काय पडणार हे पहावे लागणार आहे.

पिक पध्दतीत बदल गरजेचा

लातुर जिल्ह्यात खरिप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पिक आहे. दरवर्षी रब्बीच्या सरासरीच्या क्षेत्रात घट होत आहे तर खरिपातील सोयाबीन वाढत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करुन आर्द्रता कमी करण्यासाठी बीबीएफ पध्दतीने पेरणी करणे आवश्यक आहे. पेरणीपुर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया व पेरणीनंतर दीड महिन्याने बुरशी नाशकाची फवारणी करणे आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले आहे.

कृषी अधिकारी थेट बांधावर

पावसाने उघडीप दिल्यानंतर पिक पाहणीसाठी कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शुक्रवारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रमिला जंजिरे, अंगद सुडे यांनी रेणापूर तालुक्यातील पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.

असे करा पिकाचे व्यवस्थापन

करप्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोन्याझोल आणि सल्फर 20 ग्रम प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणे आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार 10-20 मिली स्टिकचा वापर केल्याने किडीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे कदम यांनी सांगितले. After rain, now the outbreak of karpaya disease, farmers in trouble

इतर बातम्या :

Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

साकीनाका बलात्काराची नेमकी घटना काय, तपास कुठपर्यंत पोहोचला? मुंबईच्या आयुक्तांकडून सविस्तर माहिती

Vijay Rupani Resign : गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण? विजय रुपाणींच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.