AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेटा संघटनेवर बंदी घाला, अमूलची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी, 40 लाख शेतकरी पत्र लिहिणार, नेमका वाद काय?

गुजरातमधील प्रमुख दूध उत्पादक कंपनी अमूलनं पेटा संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. Amul PM Narendra Modi PETA

पेटा संघटनेवर बंदी घाला, अमूलची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी, 40 लाख शेतकरी पत्र लिहिणार, नेमका वाद काय?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 3:30 PM
Share

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून प्रमुख दूध उत्पादक संस्था अमूल आणि आणि पेटा या संघटनेमध्ये वेगन दूध निर्मितीवरुन वाद सुरू आहे. दूध उत्पादन क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या अमूल कंपनीचे व्हाईस चेअरमन वालमजी हंबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पेटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पेटा ची भूमिका भारतीय दुध उत्पादकांच्या प्रतिमेला तडा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. (Amul Vice Chariman Valamji Humbal urged to PM Narendra Modi to ban NGO PETA)

नेमकं प्रकरण काय?

अमूलच्या उपाध्यक्षांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताच्या विकासदरामध्ये दूध उत्पादक किंवा दूध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. दूध व्यवसायाबद्दल पसरविण्यात येत असलेल्या गैर समजामुळे भारताच्या जीडीपीला मोठा धक्का बसेल, असं म्हटलं आहे. भारतातल्या दूध व्यवसाय विषयी जागतिक पातळीवर कट कारस्थान सुरू आहेत. भारतीय दूध व्यवसायिकांची प्रतिमा खराब करण्याचा डाव असल्याचे देखील वालमजी हंबाल यांनी म्हटलं आहे.

दूध उत्पादकांबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न

काही संस्था भारतीय दूध उत्पादक आणि व्यवसायाबद्दल गैरसमज प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न थांबवावा, त्या संस्थांवर कारवाई करण्यात यावी. पेटावर बंदी घालावी, त्यांच्यावर कारवाई करावी. दूध व्यवसायिकांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणे त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे असा प्रकार सुरू आहे असं वालमजी हंबाल यांनी म्हटलं.

10 कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न

हंबाल पुढे म्हणाले की, भारतातील 10 कोटी दूध उत्पादकांचा हा प्रश्न आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी याबाबत पेटा या संस्थेवर बंदी घालावी. पेटा संस्थेने तीन दिवसांपूर्वी अमूल या संस्थेला वेगन दूध तयार करण्यासंबंधी पत्र लिहिले होते. यावरुन दोन्ही संस्थामध्ये वाद सुरु झाला. भारतीय शेतकरी पाळीव प्राण्यांना त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणे जपतो, त्यांची काळजी घेतो. त्यांचा कोणताही छळ केला जात नाही. चुकीच्या माहितीवर भारतीय दूध व्यवसाय बद्दल गैरसमज पसरवले जात आहेत, असं वालमजी हंबाल म्हणाले.

शेतकरी मोदींना पत्र लिहिणार

भारतीय दुग्ध व्यवसाय भारताची गरज भागवण्यासाठी स्वयंपूर्ण आहे. या व्यवसायातून दहा कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतोय. भारतीय दूध व्यवसायाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या संस्थावर कारवाई करावी यासाठी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच अमोल 40 लाख शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार आहेत, असं वालमजी हंबाल यांनी सांगितलं.

पेटाची भूमिका काय?

ग्राहकांची वेगन दूध खरेदी करण्याची मानसिकता आहे. वेगन दूधाच्या पदार्थांना मागणी आहे. दूध संस्थानी बाजारपेठेतील बदलांचा स्वीकार करावा, असं पेटाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. वेगन दूध सोया, नारळ, काजू इत्यादीपासून बनवलं जाते.

हेही वाचा

राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणारी बक्षीस रक्कम तब्बल…

कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींसह चौघी बुडाल्या, तिघींचा अंत

(Amul Vice Chariman Valamji Humbal urged to PM Narendra Modi to ban NGO PETA)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.