AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळीचा फटका त्यात महावितरणची ‘अवकृपा’, जळगाव जिल्ह्यात 25 हजार कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत

राज्यासह जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकर्‍यांच्या कांदा, मका, गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील 25 हजार कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

अवकाळीचा फटका त्यात महावितरणची 'अवकृपा', जळगाव जिल्ह्यात 25 हजार कृषिपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 6:43 PM
Share

जळगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. खरीप हंगाामात झालेल्या नुकसानाची भर रब्बी हंगामात काढण्याच्या तयारीत शेतकरी असतांना अवकाळ पावसाने दाणादाण उडविली आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून यामुळे शेतकर्‍यांच्या कांदा, मका, गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील 25 हजार कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी होत आहे. आता रब्बी हंगामातील पिकांची कुठे उगवण झाली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकाचे नुकसान होत आहे. तर महावितरण कंपनीनेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे.

उर्वरीत कापसाचेही नुकसानच

कापूस, मका कांदा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची शेतकर्‍यांना तुटपूंजी मदत मिळाली. आता पुन्हा बँकाचे कर्ज काढून रब्बी हंगामाला सुरुवात शेतकऱ्यांनी केली होती. लागणीला आलेली रोपांसह कांदा, मका, गहू, हरभरा या रब्बी हंगामातील पिकांवरही अवकाळी पावसाने पाणी फिरविले. त्यामुळे आता शेती करायची कशी? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण कापासाची तोडणी सुरु असतनाच झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे.

कृषीपंपाचा विद्युत पुरवठाही खंडीत

जळगाव जिल्ह्यातील 25 हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जळगाव, जामनेर, चोपडा, यावल, पाचोरा, रावेर, भुसावळ आदी भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. चोपडा येथे शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलन केले. पण प्रशासन शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात न घेता आपली मनमानी सुरु ठेवली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगाव, धरणगाव तालुक्यांतही शेतकरी त्रस्त आहेत, पण ना प्रशासन लक्ष देतेय ना येथील लोकप्रतिनीधी. शेतकरी मात्र, नैसर्गिक आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहे.

संबंधित बातम्या :

वैद्यनाथ सुरु मग पनेगश्वर शुगर मिल्सकडे मुंडे कुटुंबियांचे दुर्लक्ष का ? पगारासाठी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

रब्बीतील मुख्य पिकालाच शेतकऱ्यांनी निवडला नवा पर्याय, का घटतेय ज्वारीचे क्षेत्र ?

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीन दरातील चढ-उतारानंतर काय आहे बाजारातील चित्र?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.