AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dilip Kumar :चित्रपटांचा बेताब बादशाह, फळांची विक्रीही केली, असा राहिला शेती-मातीशी संबंध

Dilip Kumar death live updates: दिलीप कुमार यांचे कुंटुबीय फळांच्या व्यवसायाशी निगडीत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बऱ्याच काळासाठी फळ विकण्याचं काम केलं होतं. दिलीप कुमार यांनी शेतीक्षेत्रात देखील काम केलं होतं.

Dilip Kumar :चित्रपटांचा बेताब बादशाह, फळांची विक्रीही केली, असा राहिला शेती-मातीशी संबंध
दिलीप कुमार
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 12:44 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील. दिलीप कुमार यांनी त्यांचा पहिला चित्रपट ज्वार भाट ते त्यांच्या अखेरच्या चित्रपटात समजातील प्रत्येक वर्गातील व्यक्तीची भूमिका पार पाडली. ( Dilip Kumar Death Do you know Dilip Kumar did fruits business before enter in Film industry)

चित्रपटांमध्ये ग्रामीण भूमिका

दिलीप कुमार यांना पहिल्यांदा विशेष ओळख मिळाली ती एका ग्रामीण व्यक्तिरेखेमुळे जी व्यक्तिरेखा शेतीशी निगडित होती. मेला, नया दौर, गंगा जमुना, सगीना या चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांनी ग्रामीण व्यक्तिरेखा साकारली होती. फक्त चित्रपटाच्या पडद्यावर नाही तर वास्तविक जीवनातही दिलीपकुमार शेतीशी निगडीत काम करत होते.

दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचं मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं पण ते जगभर दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले. दिलीप कुमार यांचे कुंटुबीय फळांच्या व्यवसायाशी निगडीत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बऱ्याच काळासाठी फळ विकण्याचं काम केलं होतं. दिलीप कुमार यांनी शेतीक्षेत्रात देखील काम केलं होतं.

नैनितालमध्ये बाग खरेदी

एका रिपोर्टनुसार, इंग्रजीची माहिती असल्यानं दिलीप कुमार यांनी ब्रिटीश आर्मी कँटीनमध्ये असिस्टंटची नोकरी मिळाली होती. काही काळानंतर ते वडिलांसाठी मुंबईत परतले होते. दिलीप कुमार फळांच्या व्यवसायात यशस्वी ठरले होते. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार दिलीप कुमार यांना त्यांच्या वडिलांना नैनितालला जाऊन सफरचंदाची बाग खरेदी करण्याची जबाबदारी सोपवली होती. तिथं जाऊन दिलीप कुमार यांनी 1 रुपयांच्या अनामत रकमेवर करार केला होता.

1944 मध्ये ज्वारभाटा या चित्रपटाद्वारे दिलीपकुमारांनी बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. पुढे पाच दशके म्हणजे 50 वर्षे या अभिनेत्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रप्रेमींना भुरळ घातली…65 चित्रपट दिलीपकुमारांच्या नावावर आहेत.अंदाज, आन, दाग, देवदास, आझाद, मुगल-ए-आझम, गंगा जमुना, राम और श्याम अशा कित्येक गाजलेल्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे…

1976 नंतर पाच वर्षे दिलीपकुमारांनी अभिनयापासून ब्रेक घेतला. पुनरागमन केले ते क्रांतीसारख्या अजरामर चित्रपटानंच..शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर अशा प्रेक्षकांना आजही भुरळ घालणाऱ्या चित्रपटांनी दिलीपकुमार यांची जादू कायम आहे हे सिद्ध केलं…1998 साली आलेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. दिलीपकुमार ‘बॉलिवूडच्या गोल्डन एज’मधला शेवटचा तारा होता. तोही आता निखळून पडला.

संबंधित बातम्या:

दिलीपकुमार : अभिनयाचा जादूगार, अभिनेत्रींची पसंती आणि बॉक्सऑफिसचा हुकमी एक्का

Sharad Pawar | देशाने एक महानायक गमावला, शरद पवारांकडून दिलीप कुमारांना श्रद्धांजली

( Dilip Kumar Death Do you know Dilip Kumar did fruits business before enter in Film industry)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.