AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबणीवर जाऊ शकते. तर, दुसरीकडे वाशिममध्ये खतांचाही तुटवडा जाणवत आहे. Monsoon rain started in Maharashtra

मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा
डीएपी आणि सोयाबीन बियाणं
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 2:30 PM
Share

मुंबई: महाराष्ट्रात मान्सून पाऊस दाखल झाला आहे. राज्यातील 80 टक्केहून अधिक भाग मान्सूननं व्यापला आहे. मान्सून पाऊस दाखल झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांची पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी लगबग सुरु आहे. मान्सून दाखल होऊन तीन दिवस होऊन गेलेले आहेत. महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबणीवर जाऊ शकते. तर, दुसरीकडे वाशिममध्ये खतांचाही तुटवडा जाणवत आहे. (Monsoon rain started in Maharashtra Parbhani farmers waiting for soybean seeds from Mahabeej washim farmers waiting for fertilizers)

महाबीजच्या बियाण्याची परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा

मृग नक्षत्र शेतकऱ्यांसाठी अतिशय धावपळीचं असतं. या नक्षत्राच्या आगमनानेच शेतकरी आपल्या शेतीत पेरणी करतो. मात्र, यंदा मृग नक्षत्राचे आगमन होऊन 3 दिवस लोटले आहेत. तरीही महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर जाऊ शकते

वाशिम जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा

वाशिम जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. कृषी सेवा केंद्रांकडे खतांची मागणी शेतकरी करत असता, कृषी सेवा केंद्राकडून खतं उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर जिल्ह्यात पाऊस बरसल्याने पेरणीरणीपूर्वी मशागतीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्यातील हळदीची अनेक ठिकाणी लागवड शेतकरी करत असल्याने शेतकऱ्यांची हळद लागवडीचे सुद्धा लगबग सुरू झाली आहे.

बी-बियाणे, रासायनिक खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. डीएपी, 10:26:26 या रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.सदर खत कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे.

बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

मान्सून दाखल झाल्यानं शेतकरी पेरणी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करत असल्याचं चित्र आहे. मात्र, शेतकऱ्यांना हव्या तितक्या प्रमाणात बियाणं आणि खतं मिळत नसल्याच समोर आलं आहे.

सोयाबीन पेरणी कधी करावी?

खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

TV9 Marathi Impact: लासलगांव बाजार समितीत 75 वर्षांची पंरपरा रद्द, अमावस्येला कांदा लिलावाला सुरुवात

Monsoon rain started in Maharashtra Parbhani farmers waiting for soybean seeds from Mahabeej washim farmers waiting for fertilizers

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.