AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विज तोडणीचा ‘शॅाक’ शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन

वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने आता धडक वसुली मोहिम सुरु केली आहे. कृषीपंपधारकांना तर 24 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. आता थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. सांगली येथे विज कनेक्शन तोडणी बंद झालीच पाहिजे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या देण्यात आला होता. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मनसेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

विज तोडणीचा 'शॅाक' शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन
कृषीपंपाचा विद्युत पुरवठी खंडीत करु नये या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त यांना देण्यात आले
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 3:41 PM
Share

लातूर : वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने आता धडक वसुली मोहिम सुरु केली आहे. कृषीपंपधारकांना तर 24 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. आता थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. सांगली येथे विज कनेक्शन तोडणी बंद झालीच पाहिजे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या देण्यात आला होता. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मनसेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

महावितरणची सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंप धारक ग्राहकांकडे आहे. नियमित बिल अदा केले जात नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. आता महावितरण कंपनीने मध्यंतरी थकबाकी अदा करण्याचे अवाहन केले होते. तर आता 24 नोव्हेंबरपासून थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात आहे. या करवाईमुळे आता रोष व्यक्त होऊ लागला आहे,

ऐन रब्बीच्या तोंडावरच वसुली मोहिम

शेतकरी हे महावितरणचे थकीत बील अदा करीत नाहीत. किमान आता रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याच्या गरजेपोटी तरी विजबिल अदा करतील यामुळे ऐन रब्बी हंगामातच महावितरणकडून वसुली आणि कारवाईची केली जात असते. यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठाही आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे थेट विजतोडणीची कारवाई करु नये यासाठी शेतकरी संघटना पुढे येत आहेत.

सांगलीत महावितरणच्या कार्यांलयासमोरच ठिय्या

ऐन रब्बी हंगामातच विजतोडणी का याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. महावितरणच्या परिसरात मोर्चा दाखल होताच पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर मात्र, संतप्त आंदोलकांनी थेट महावितरणचे कार्यालय उघडूनच कार्यालयातच ठिय्या दिला होता. शिवाय कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत करु नये अशी मागणी केली.

औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तांना मनसेचे निवेदन

मराठवाड्यातही महावितरणची वसुली मोहिम सुरु आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात थकबाकीदारांच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठी मध्यंतरी खंडीत करण्यात आला होता. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सक्तीची विज वसुली थांबवावी आणि विद्युत पुरवठाही खंडीत करु नये अशा मागणीचे निवेदन मनसेचे दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी विभागीय आयुक्त यांना दिले आहे.

संबंधित बातम्या :

पेरलं तरच उगवेन..आगामी खरिपासाठी कशी राबवली जातेय बीजोत्पादन प्रक्रिया, शेतकऱ्यांचा सहभागही महत्वाचा

सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल

…अखेर कृषी आयुक्तांचे भाकित खरे ठरले, काय होते केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.