Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे.

अदानी यांच्या पावलामुळे चीनची झोप उडणार, चीनवर वर्चस्व मिळवण्याची तयारी
gautam adani
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 8:53 AM

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी उद्योगाचा विस्तार करत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कंपन्याची चांगलीच भरभराट झाली. आता अदानी यांनी आपले लक्ष दक्षिण भारतातील महत्वाचे बंदर असलेल्या विझिंजमकडे केंद्रीत केले आहे. या ठिकाणावरील गुंतवणूक अदानी वाढवणार आहे. ही गुंतवणूक जवळपास 20 हजार कोटी रुपयांची करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून विझिंजम बंदराचा विस्तार आणि विकास करण्याचा प्रयत्न आहे. जगातील मोठी जहाज या ठिकाणी येऊ शकतील, या पद्धतीने या बंदराचा विकास या बंदरचा अदानी ग्रुप करणार आहे.

बंदराची क्षमता पाच पट वाढणार

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेडचे एमडी करण अदानी यांनी सांगितले की, 2028 पर्यंत विझिंजम आंतरराष्ट्रीय ट्रांसशिपमेंट टर्मिनलमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा आहे. त्यामुळे या बंदराची क्षमताही पाच पट वाढणार आहे. या बंदराचे काम 2045 पर्यंत करण्याचे होते. परंतु आता हे काम 2028 पर्यंतच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे चीनमधील समुद्र व्यापार भारताकडे घेता येणार आहे.

गुंतवणूक रक्कम केली दुप्पट

दक्षिण भारतात असलेल्या विझिंजम बंदर हे आंतरराष्ट्रीय समुद्र मार्गांचा जवळ आहे. त्या ठिकाणी मोठे जहाज सहज येऊ शकतात, असे शिपिंग चॅनल आहेत. अदान ग्रुप या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. परंतु आता ही रक्कम दुप्पट करत वीस हजार कोटी करण्यात आली आहे. त्यात जहाज इंधन सुविधा, एक लक्झरी क्रूझ टर्मिनल आणि दोन मिलियन टन सिमेंट दळणारे युनिट आहे.

हे सुद्धा वाचा

चीनला मिळणार मोठे आव्हान

गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी यांनी सांगितले की, विझिंजम बंदराचे काम 2045 पर्यंत पूर्ण करण्याचे होते. परंतु ते आता 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या क्षेत्रात चीनकडून होणारी प्रगती पाहिल्यानंतर हे काम लवकर करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर मोठे जहाज येऊ शकतील. त्यामुळे चीनच्या व्यापाऱ्यास आव्हान देता येणार आहे.

विझिंजम बंदराच्या कामाचे उद्धघाटन मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात झाले होते. अदानी ग्रुपचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सध्या मोठे जहाज भारतीय बंदरांमध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे ते कोलंबो, दुंबई, सिंगापूर या शहरांची निवड करतात. परंतु विझिंजम बंदराचे काम पूर्ण झाल्यावर ही अडचण दूर होणार आहे.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.