AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा….

केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाच्या सुधारणांतर्गत कुटुंब पेन्शनची मर्यादा 45 हजार रुपयांवरून दरमहा 1.25 लाख रुपये केली आहे.

आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा....
पेन्शन फंड
| Edited By: | Updated on: Feb 13, 2021 | 10:10 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी शुक्रवारी कौटुंबिक पेन्शन (Family Pensions) अडीच पटहून अधिक वाढवलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाच्या सुधारणांतर्गत कुटुंब पेन्शनची मर्यादा 45 हजार रुपयांवरून दरमहा 1.25 लाख रुपये केली आहे. यामुळे मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील लोकांचं जीवनमान सोपं होईल आणि त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षा मिळेल, असा यामागे हेतू आहे. (family pension limit increased upto 125000 per month here is the details)

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती वेतन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) मुलाचा किंवा त्याच्या पालकांचा मृत्यू झाल्यास कुटुंब पेंशनचे दोन हप्ते मागे घेण्यास पात्र असलेल्या रकमेबाबत स्पष्टीकरण जारी केलं आहे. त्यामध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यामुळे कठीण काळात कुटुंबाला याची मदत होणार आहे.

अडीच पट वाढ

याआधीही ही रक्कम 45 हजार रुपयांपर्यंत होती. ज्यामध्ये आता अडीच पटीनं वाढ करण्यात आली असून याची रक्कम 1.25 लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. असं स्पष्टीकरण अनेक मंत्रालयं आणि विभागांकडून प्राप्त झालेल्या संदर्भांच्या आधारे देण्यात आलं आहे.

दोन मुलांना मिळणार पेन्शन

मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1972च्या नियम 54 च्या पोट-नियम (11) नुसार पती-पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना हे नियम लागू होणार आहेत. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या दोन मुलाला कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, देशातील 21,19,316 शेतकर्‍यांचा वृद्धापकाळ मोदी सरकारनं सुरक्षित केलं आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी (farmers pension scheme) पेन्शन योजनेत नोंदणी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांना या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांच्यासाठी ते विनामूल्य आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून या योजनेचा प्रीमियम कापला जाणार नाही. त्याऐवजी सरकारकडून वार्षिक स्वरूपात देण्यात येणाऱ्या 6000 रुपयांतून ते पैसे वजा केले जातील. फक्त यासाठी शेतकऱ्याला तसा पर्याय निवडावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी झारखंडमधून ही योजना सुरू केली होती. परंतु त्याअंतर्गत 9 ऑगस्टपासूनच नोंदणीला सुरुवात झाली होती. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana) असे त्या योजनेचे नाव आहे. शेतकर्‍यांना समर्पित असलेली सर्वात मोठी पेन्शन योजना आहे. यात सामील झालेल्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळते. (family pension limit increased upto 125000 per month here is the details)

संबंधित बातम्या – 

नोकरी बदलण्यात महिन्याचे अंतर असल्यास मोठा फटका, काय आहे संपूर्ण प्रकरण?

India’s first CNG Tractor: आता जुन्या ट्रॅक्टरमध्ये CNG किट बसवता येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Petrol Diesel Price : आज पेट्रोल स्वस्त की महागलं? वाचा तुमच्या शहरातले भाव

(family pension limit increased upto 125000 per month here is the details)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.