AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानतळावर कोव्हीड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान

डीजीसीएने विमानतळांना या संदर्भात कडक कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. विमानतळाच्या आवारात कोरोनाचे प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावण्यात यावा, असे नियामकाने म्हटले होते.

विमानतळावर कोव्हीड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन करू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान
| Edited By: | Updated on: Apr 04, 2021 | 9:54 AM
Share

मुंबई : मुंबई विमानतळाने (Mumbai Airport) कोव्हीड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर 1 एप्रिलपासून दंड आकारण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची वाढती घटना लक्षात घेता नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) याबाबतचा इशारा दिला होता. डीजीसीएने आपल्या नेहमीच्या तपासणीत असे आढळले आहे की कोरोनाच्या प्रोटोकॉलचे काही विमानतळांवर प्रवाशांकडून उल्लंघन केले जात आहे. डीजीसीएने विमानतळांना या संदर्भात कडक कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. विमानतळाच्या आवारात कोरोनाचे प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावण्यात यावा, असे नियामकाने म्हटले होते. (follow covid guidelines on mumbai airport or else will have to pay rs 1000 fine)

आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डीजीसीएच्या निर्देशानुसार कोव्हीड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन करणार्‍या प्रवाशांना 1 एप्रिलपासून एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, जर एखादा प्रवासी कोरोना सुरक्षा नियम जसे की तोंड आणि नाक झाकलेला मास्क न घातल्यास आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसेल तर त्याला एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

प्रवाशांवर करडी नजर

गेल्या वर्षी मेमध्ये, सीएसएमआयएने विमानतळांवरील सुरक्षा पद्धतींविषयी मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणली होती. देशांतर्गत उड्डाणांकरता त्याच्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचा (SOP) भाग म्हणून विमानतळाच्या पीए प्रणालीद्वारे नियमित घोषणा देखील केल्या जातात. त्याच वेळी, मार्शल देखील प्रवाशांना सुरक्षिततेबाबत खबरदारी घेण्यास प्रोत्साहित करतात.

मुंबईत 9 हजाराहून अधिक कोरोनाची प्रकरणे

शनिवारी कोरोनाचे 9,000 हून अधिक नवीन प्रकरणे बाहेर आली आहेत. 5,322 लोक बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 27 मृत्यू झाले आहेत. शनिवारी महाराष्ट्रात फक्त 49,447 कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली.

गेल्या 24 तासांत 37,821 लोक बरे झाले आणि 277 जणांना आपला जीव गमवावा लागला. मार्च 2021 मध्ये, विमान वाहतुक नियामकांनी सांगितले की प्रवाश्यांनी विमानात मास्क योग्य प्रकारे न घातल्यास किंवा कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर फ्लाइटमधून त्यांना डी-बोर्ड केले जाईल. (follow covid guidelines on mumbai airport or else will have to pay rs 1000 fine)

संबंधित बातम्या – 

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट! आज 2 तास काम नाही करणार बँकेची ‘ही’ सेवा

सलग 5 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे दिलासा, वाचा आजचे ताजे दर

Business in India : घर बसल्या कमी बजेटमध्ये सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी खास आयडिया

(follow covid guidelines on mumbai airport or else will have to pay rs 1000 fine)
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.