AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMSBY Scheme संदर्भात शनिवारी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची बैठक, काय होणार बदल?

असा विश्वास आहे की, या बैठकीत कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार केला जाईल. तसेच विमा कंपन्या विमा रक्कम निश्चित कालावधीत तत्काळ प्रभावाने नॉमिनीला हस्तांतरित करेल. PMSBY Scheme nirmala sitharaman

PMSBY Scheme संदर्भात शनिवारी अर्थमंत्र्यांची महत्त्वाची बैठक, काय होणार बदल?
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 7:49 PM
Share

नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारमण सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या प्रमुखांची शनिवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजने (PMSBY) वर तोडगा काढण्याच्या प्रक्रियेवर अधिक चर्चा होईल. असा विश्वास आहे की, या बैठकीत कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार केला जाईल. तसेच विमा कंपन्या विमा रक्कम निश्चित कालावधीत तत्काळ प्रभावाने नॉमिनीला हस्तांतरित करेल. (Important meeting of Finance Ministers on PMSBY Scheme on Saturday, what will change?)

10.33 कोटी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी केली

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 5 मेपर्यंत 23.37 कोटी पंतप्रधान सुरक्षा जीवन विमा योजनेंतर्गत आणि 10.33 कोटी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी केली गेलीय. या दोन्ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आल्यात. सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने सामाजिक सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. थेट लाभ हस्तांतरण लक्षात घेऊन पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत देशभरात 42 कोटी बँक खाती उघडण्यात आली. यामुळे योजनांचा फायदा सरकारला होण्यास सुलभ झाला आणि मध्यस्थांची समस्या दूर झाली.

एकूण 4 लाख रुपयांचा विमा उपलब्ध

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत एकूण 4 लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. PMJJBY मध्ये वयाच्या 55 वर्षांपर्यंत लाईफ कव्हर उपलब्ध आहे. हा एक प्रकारचा मुदत विमा आहे, जो दरवर्षी नूतनीकरण करावा लागतो. यात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबातील सदस्य सरकारकडून दोन लाख रुपयांचा दावा करू शकतात. यामध्ये कोरोना साथीचा रोग इतर आजारांसमवेतही व्यापला जात आहे. अशा परिस्थितीत एखाद्या माणसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तरी कुटुंब पैशासाठी दावा करू शकतो. दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण केले जाते. त्याचे वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक सरकारी अपघाती धोरण (Personal Accident Insurance Scheme) आहे. या योजनेत एक वर्षासाठी अपघाती मृत्यूचा समावेश आहे, म्हणजेच अपघातामुळे मृत्यू आणि अपघातामुळे अपंगत्व आल्यास त्याला लाभ मिळू शकतो. दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण केले जाते. या योजनेत तीन प्रकारचे फायदे उपलब्ध आहेत. पहिला फायदा अपघाती मृत्यूशी संबंधित आहे. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला दोन लाख रुपये मिळतात. जरी एखाद्याचे दोन्ही हात, पाय किंवा डोळे एखाद्या अपघातात गेले, तर त्याला 2 लाखांचा फायदा मिळेल. जर त्याने एक डोळा गमावल्यास किंवा एका पायाने किंवा हाताने अपंग झाल्यास त्याला 1 लाखांचा फायदा मिळेल.

संबंधित बातम्या

SBI Alert : या खातेदारांना जमा करावे लागेल आधार खाते आणि पॅनकार्ड, चेक करा तुमचेही नाव आहे का?

HDFC म्युच्युअल फंडाकडून ‘या’ कंपनीचे 130000 शेअर्स खरेदी, गुंतवणूकदारांना 143 कोटींचा फायदा

Important meeting of Finance Ministers on PMSBY Scheme on Saturday, what will change?

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.