Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका, देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणे जेणेकरुन ते आपले उत्पन्न वाढवू शकतील, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे (Mukesh Ambani invest in bill gates green venture company).

मुकेश अंबानी यांचा दिवाळी धमाका, देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 4:19 PM

मुंबई : रिलायन्स कंपनीचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अंबानी यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स यांच्या क्लीन एनर्जीच्या बेकथ्रू एनर्जी वेंचर्स लिमिटेड कंपनीत 5 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 375 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे (Mukesh Ambani invest in bill gates green venture company).

विशेष म्हणजे अंबानी यांच्याआधी उद्योगपती जेफ बेजोस, मायकल ब्लूमबर्ग, जॅकमा, मासायोशी सोन यासारख्या दिग्गजांनी ब्रेकथ्रू एनर्जी वेंचर्समध्ये गुंतवणूक केली आहे (Mukesh Ambani invest in bill gates green venture company).

बिल गेट्स यांची ग्रीन वेंचर्स कंपनी ऊर्जा आणि कृषी तंत्रज्ञानाच्या विकासात गुंतवणूक करुन हवामान संकटावर उपाय शोधण्यासाठी काम करते. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणे जेणेकरुन ते आपले उत्पन्न वाढवू शकतील, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाचा भारतातील शेतकऱ्यांनाही फायदा होईल.

रिलायन्स इंडस्ट्रीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या या प्रयोगाचा फायदा संपूर्ण देशाला होईलच त्याबरोबर गुंतवणुकदारांनाही होईल. या प्रकल्पात गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, अशाप्रकारच्या गुंतवणुकीसाठी अद्याप रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी देण्यात आलेली नाही. ही गुंतवणूक रिलेटेड पार्टी ट्रान्जेक्शन अंतर्गत होत नाही. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्टीज लिमिटेडच्या कुठल्याही प्रमोटर, प्रमोटर ग्रुप किंवा ग्रुप कंपनीचे कोणतेही हीत नाही, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

रिलायन्स कंपनीची सब्सिडीयरी विकून गुंतवणूक गोळा

बिल गेट्स यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सब्सिडीयरीचा वाटा वाटा विकून पैसा गोळा करत आहे. आरआयएलने आतापर्यंत जियो प्लेटफॉर्म्समधून 32.96 टक्क्याचा वाटा विकून 1.52 लाख कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधून 10.09 टक्के सब्सिडीयरीचा वाटा विकून जवळपास 47 हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत. या पैशांचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापर केला जात आहे.

हेही वाचा :

रिलायन्स जियोचा सुपरफास्ट वेब ब्राऊझर JioPages लाँच, मराठीसह आठ भारतीय भाषा उपलब्ध

'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.