AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटांच्या गाडीला ‘सुमो’ नाव कसे पडले? हे जपानी नाव नव्हे तर मराठी व्यक्तीच्या कार्याचा रतन टाटांनी केला गौरव

How did Tata Sumo get its name: सुमंत मूळगावकर यांचा 1 जुलै 1989 रोजी मृत्यू झाला. परंतु टाटा समूह त्यांना विसरला नव्हता. 1994 मध्ये टाटा समुहाची दणकट गाडी लाँच झाली. मग रतन टाटा यांनी त्यांच्या या कर्मचाऱ्यांचे नाव त्या गाडीला दिले. त्यांच्या नाव आणि आडनावाच्या अद्याअक्षरावरुन त्या गाडीला सुमो नाव दिले.

टाटांच्या गाडीला 'सुमो' नाव कसे पडले? हे जपानी नाव नव्हे तर मराठी व्यक्तीच्या कार्याचा रतन टाटांनी केला गौरव
Sumant Moolgaokar and Ratan Tata
| Updated on: Oct 18, 2024 | 10:55 AM
Share

भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून देश अजूनही सावरु शकला नाही. पण फक्त रतन टाटाच नाही तर त्यांच्यापूर्वी जे जे व्यक्ती चेअरमन झाले त्यांनी देश अन् समाज यांनाच प्राधान्य दिले. व्यक्तीने केलेल्या कार्याची नेहमी दखल घेतली. त्यांचा गौरव केला आहे. कधीकाळी भारतीय वाहन बाजारपेठेच वर्चस्व गाजवणाऱ्या टाटा सुमो गाडीला हे नाव पडले तरी कसे? कोणालाही सुमो हे नाव जपानी वाटते. परंतु सुमोचा आणि जपानचा काहीच संबंध नाही. टाटा समुहाने एका मराठी व्यक्तीचा केलेला हा गौरव आहे. ते मराठी व्यक्ती म्हणजे पद्मभूषण सुमंत मूळगावकर होय. त्यांच्या नावाच्या अद्याक्षरावरुन सुमो हे नाव दिले. त्यांनी टेल्को आणि टाटा मोटर्सच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा सन्मान दिला गेला.

कोण आहेत सुमंत मूळगावकर

सुमंत मूळगावकर यांचा जन्म 5 मार्च 1906 रोजी मुंबईत झाला. त्यांनी इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनमधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले. सुमंत मूळगावकर हे एसीसी सिमेंटमध्ये काम करत होते. त्यावेळी जेआरडी टाटा यांनी त्यांना संपर्क केला. किती दिवस तुम्ही विटा चिपकवण्याचे काम करणार? असे त्यांना सांगितले. तसेच एससीसी सिमेंटचे चेअरमन सर होमी मोदी यांना सुमंत मूळगावकर यांना सोडण्याची विनंती केली. परंतु सर होमी मोदी यांनी नकार दिला. परंतु जेआरडी आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर सुमंत मूळगावकर टाटा कंपनीत रुजू झाले.

भारत सरकारने दिला पद्मभूषण

सुमंत मूळगावकर 1949 मध्ये टाटाच्या टाटा इंजिनीअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी म्हणजे टेल्कोमध्ये प्रभारी संचालक म्हणून रुजू झाले. 1954 मध्ये टाटाच्या ट्रक निर्मिती प्रकल्पात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. 1966 मध्ये टेल्को प्रकल्पाची उभारणी केली. त्यांनी टाटाच्या ट्रकमध्ये लक्षणीय सुधारणा केल्या. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला या ट्रक आल्या. ते टाटा स्टीलचे उपाध्यक्ष देखील होते. त्यांनी केलेल्या कामांमुळे 1990 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.

रतन टाटा यांनी दिले सुमो नाव

सुमंत मूळगावकर यांचा 1 जुलै 1989 रोजी मृत्यू झाला. परंतु टाटा समूह त्यांना विसरला नव्हता. 1994 मध्ये टाटा समुहाची दणकट गाडी लाँच झाली. मग रतन टाटा यांनी त्यांच्या या कर्मचाऱ्यांचे नाव त्या गाडीला दिले. त्यांच्या नाव आणि आडनावाच्या अद्याअक्षरावरुन त्या गाडीला सुमो नाव दिले. एखाद्या कर्मचाऱ्यांचे कौतूक करण्याचा दिलदारपणा दिवंगत रतन टाटां यांच्याशिवाय आणखी कोण करणार? त्यानंतर टाटांची सुमो शहरापासून ग्रामीण भागापर्यंत लोकप्रिय झाली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.