AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर SBI बँकेला बुडालेले पैसे परत मिळाले; विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त करुन 5824 कोटींची भरपाई

Vijay Mallya | विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची संपत्ती बँकाकडे हस्तांतरित केली असली तरी यामधून केवळ 40 टक्के नुकसानीचीच भरपाई झाली आहे.

अखेर SBI बँकेला बुडालेले पैसे परत मिळाले; विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त करुन 5824 कोटींची भरपाई
विजय माल्ल्या
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 11:30 AM
Share

मुंबई: मद्यसम्राट विजय माल्ल्या याने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज बुडवून माल्ल्या परदेशात फरार झाला होता. त्यामुळे SBI बँकेला 9 हजार कोटींच्या रक्कमेवर पाणी सोडण्याची वेळ आली होती. मात्र, गेल्या काही काळात सक्तवसुली संचलनालयाने (ED) विजय माल्ल्याच्या देशातील आणि परदेशातील मालमत्ता जप्त केल्या होत्या. या मालमत्तांच्या लिलावातून मिळालेले 5,824.5 कोटी रुपये नुकतेच SBI बँकेला देण्यात आले. त्यामुळे बँकेला काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Vijay Mallya money state bank of India SBI get 5824 crore)

भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची मिळून 9371कोटी रुपयांची संपत्ती बँकांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली होती. सक्तवसुली संचलनालयाने या तिघांची तब्बल 18 हजार कोटींची मालमत्ता जप्त केली होती. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांनाही परदेशातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या तिघांनीही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून कर्ज म्हणून घेतलेले पैसे आपल्या बेनामी कंपन्यांमध्ये वळवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. या तिघांनी मिळून बँकांचे 22,585.83 कोटी रुपये बुडवले होते.

फक्त 40 टक्के नुकसानीची भरपाई

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या तिघांची संपत्ती बँकाकडे हस्तांतरित केली असली तरी यामधून केवळ 40 टक्के नुकसानीचीच भरपाई झाली आहे. विजय माल्ल्याने एसबीआयकडून तब्बल 9000 कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, त्या मोबदल्यात एसबीआयला केवळ 5,824.5 कोटी रुपयेच मिळाले आहेत.

माल्ल्याकडे वकिलाला द्यायलाही पैसे नाहीत?

विजय माल्ल्या पूर्णपणे कंगाल झाल्याची माहिती आहे. कोर्ट कचेऱ्यांचा फेरा मागे लागल्याने आर्थिक नाकेबंदी झाल्याने मल्ल्याकडे वकिलांना देण्याइतपतही पैसे नाहीत. त्यामुळे वेळेत फी नाही दिली तर खटला लढणार नसल्याचा इशारा त्याच्या वकिलाने दिला आहे. त्यामुळे माल्ल्याची डोकेदुखी वाढली आहे. भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून मल्ल्या लंडनला फरार झाला आहे. कधीकाळी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या मल्ल्याला आता मात्र आर्थिक घरघर लागली आहे. त्याला लंडनमध्ये हजार आणि लाख रुपयांचाही हिशोब ठेवावा लागत आहे. त्याच्या वैयक्तिक खर्चांनाही चाप लागला असून वकिलांना देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे उरले नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मोठा झटका, ब्रिटिश न्यायालयाने बँकरप्सी याचिका फेटाळली

अनेकांना गंडवणारा मेहुल चोक्सी हनी ट्रॅपमध्ये अडकला? मिस्ट्री गर्लमुळे गूढ वाढलं

Mehul Choksi : ‘भारतातून पळून गेलेलो नाही, उपचारासाठी देश सोडला’, घोटाळेबाज मेहुल चोक्सीचा अजब दावा

(Vijay Mallya money state bank of India SBI get 5824 crore)

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.