AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप!

शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल होताच बिडकीन पोलिसांनी संतोष राठोडचा शोध घेतला असता तो कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराला घेराव घालत ताब्यात घेतलं.

औरंगाबादच्या 30-30 योजनेच्या मास्टरमाइंडला अखेर बेड्या, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप!
औरंगाबादमधील 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोष राठोड
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 10:18 AM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील बहुचर्चित 30-30 घोटाळ्याच्या (30-30 Scam) सूत्रधाराला शुक्रवारी पोलिसांनी अखेर अटक केली. कन्नड येथील त्याच्या घराला घेराव घालत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. मराठवाड्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांना 30 टक्के व्याजासह पैसे परत देण्याच्या नावाखाली याने हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. शुक्रवारी एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी संतोष राठोड (Santosh Rathod) याला कन्नड येथील घरातून अटक केली.

काय आहे 30-30 घोटाळा?

मराठवाड्यात  DMIC प्रकल्पात शेकडो शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली. सरकारने याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला. आता शेतकऱ्यांकडे बक्कळ पैसा आहे, हे पाहून औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने शेतकऱ्यांसाठी गुंतवणुकीची एक योजना आणली. मासिक 30 टक्के परतावा मिळवून देतो, असे सांगण्यात आले. सुरुवातीला संतोषने शेतकऱ्यांना परतावाही दिला, त्यामुळे योजनेची व्याप्ती हळू हळू बिडकीन, पैठण, औरंगाबादमधील इतर तालुक्यांसह महाराष्ट्रात वाढत गेली. लोकांनी घरं, जमिनी विकून त्याच्याकडे पैसे गुंतवले. मात्र वर्षभरापासून शेतकऱ्यांना व्याज नाही आणि मुद्दलाचे पैसेही परत मिळालेले नाहीत.

30-30 नंबरच्या पॉश गाड्या, पैशांसाठी पोते!

ग्रामीण भागातील लोकांवर भुरळ टाकण्यासाठी संतोष राठोडने वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्याचे बोलले जाते. 30-30 नंबरच्या आलिशान गाड्यांचा ताफा गावात येत, सुटा-बुटातले लोक योजनेसंबंधी माहिती सांगत. तसेच गावातील लोकांकडून जी रक्कम घ्यायचीय, ती केवळ रोकड पद्धतीचे घ्यायची, अशी त्यांची पद्धत होती. त्यामुळे या व्यवहाराचे कोणतेही लेखी पुरावे शेतकऱ्यांकडे नाहीत. लोकांकडून घेतलेल्या पैशांवर याने अनेक विदेश वाऱ्याही केल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल होताच बिडकीन पोलिसांनी संतोष राठोडचा शोध घेतला असता तो कन्नड तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घराला घेराव घालत ताब्यात घेतलं. रात्री त्याला बिडकीन पोलीस ठाण्यात हजर करत अटक करण्यात आली. आज शनिवारी संतोष राठोड याला न्यायालयात हजर केले जाईल.

इतर बातम्या-

Pune School Reopen : पुण्यातल्या शाळा सुरु होणार का? निर्णयासाठी आजचा दिवस मोठा, अजित पवारांची बैठक

Priyanka Chopra | प्रियंका आई होताच सेलिब्रिटींच्या दिलसे शुभेच्छा, कोण काय म्हणालं?, फॅन्सचा सल्ला काय?

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.