AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिक्षात बसल्यावर चालकाचे बदलले हावभाव, छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

शहरातील मोंढा नाका ते आकाशवाणी चौकादरम्यान घडली घटना, घाबरलेलल्या तरुणीने रिक्षा थांबवायला सांगूनही त्याने वेग आणखी वाढवला, जीवाच्या भीतीने तरुणीने चालत्या रिक्षातून उडी मारली, गंभीर जखमी

रिक्षात बसल्यावर चालकाचे बदलले हावभाव, छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी
तरुणीची धावत्या रिक्षातून उडी
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 2:27 PM
Share

औरंगाबाद: एखादी तरुणी रिक्षात बसली, रिक्षा सुरू झाल्यानंतर चालकाचे हावभाव बदलले तर काय करणार? कुणाची मदत घेणार? थांबवायला सांगितले तरीही रिक्षा अजूनही सुसाट निघाली तर? आपली छेडछाड( Harassment of women )  किंवा अपहरण होणार नाही ना.. या विचारानं थरकाप उडालेल्या तरुणीनं चक्क धावत्या रिक्षातूनच उडी मारल्याचा प्रकार नुकताच औरंगाबाद (Aurangabad crime)  इथं घडला. या प्रकारात तरुणी गंभीर जखमी झाली. (Due to fear of harassment young girl jumped off auto rickshaw in Aurangabad, Maharashtra)

औरंगाबादमध्ये आज (शनिवारी) भर दिवसा, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडला. शहरातील मोंढा नाका ते आकाशवाणी चौक चौकादरम्यान ही तरुणी रिक्षात बसली. संबंधित चालकाने रिक्षा सुरू केली. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली.

थांबवायला सांगितले तरीही वेग वाढवला

रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ तो रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं आणखीच वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून उडी मारली. या प्रकरात तरुणी गंभीर जखमी झाली.

धीट व्हा, पोलिसांना फोन करा!

शिक्षण किंवा नोकरी-कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलींना अनेकदा छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. कोणावरही कोणताही प्रसंग ओढवू शकतो. अशा वेळी घाबरून न जाता, तरुणींनी सतर्कतेने पोलिसांना फोन करणे, हा उत्तम मार्ग असल्याचे आश्वासन दामिनी पथकाच्या प्रमुख निर्मला निंभोरे यांनी दिले. शहरात सर्व प्रमुख ठिकाणी, दूध डेअरी चौक, क्रांती चौक, आकाशवाणी चौक, गुलमंडी इत्यादी भागात पोलिसांची वाहनं फिरत असतात. त्यामुळे घटनास्थळी पोलिस अगदी दोन मिनिटात दाखल होऊ शकतात. फक्त संकटात सापडलेल्या व्यक्तींनी पोलिसांना एक फोन केला पाहिजे, अशी विनंती निर्मला निंभोरे यांनी केली.

हेल्पलाईन नंबर सेव्ह करा – 0240-2240500

शहरातील संकटातील व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांना कधीही पोलिसांची मदत लागल्यास त्यांनी तत्काळ 0240-2240500 हा क्रमांक डायल करून कंट्रोल रुमला माहिती दिली पाहिजे. कंट्रोल रुमवरून संबंधित परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मदतीसाठी पाठवले जाते. त्यामुळे आपण फोन केल्यावर पोलिस कधी येतील आणि कधी मदत मिळेल, या विचारात न राहता, संकटातील व्यक्तींना तत्काळ फोन केला पाहिजे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता दामिनी पथकाचे 1090, 1091 हे हेल्पलाइन नंबरही आहेत. (Due to fear of harassment young girl jumped off auto rickshaw in Aurangabad, Maharashtra)

रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या

औरंगाबादमध्ये तिरपी बस बेदरकारपणे दामटवणाऱ्या एसटी बसचालकावर अखेर गुन्हा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.