AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू लग्नात नाचलीसच का? नवरा-बायकोत जुंपली, चालत्या बाईकवरून उतरून बायकोची थेट कालव्यात उडी; नवऱ्यानेही…

उत्तर प्रदेशात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नी लग्न सोहळ्यात नाचली म्हणून नवऱ्याचं आणि तिचं भांडण झालं. लग्नाहून परततानाही दोघांमध्ये वाद सुरूच होता. त्यामुळे पत्नीने बाईकवरून उतरून थेट कालव्यात उडी घेतली.

तू लग्नात नाचलीसच का? नवरा-बायकोत जुंपली, चालत्या बाईकवरून उतरून बायकोची थेट कालव्यात उडी; नवऱ्यानेही...
canalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 31, 2023 | 6:44 AM
Share

हरदोई : उत्तर प्रदेशातील हरदोईच्या माधौगंज येथे अत्यंत धक्कादायक घटना घढली आहे. लग्नात नाचण्यावरून नवरा-बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यामुळे बायकोने थेट चालत्या बाईकवरून उतरून कालव्यात उडी घेतली. पत्नीला वाचवण्याच्या नादात नवऱ्यानेही कालव्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रचंड वेग असल्याने दोघेही वाहून गेले. या दोघांचाही युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

काल ही घटना घडली. दोघा नवरा बायकोने कालव्यात उडी घेतल्याचं कळाल्यानंतर जीवरक्षकांनी या दोघांचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अजूनपर्यंत दोघांचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. अंधार झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं आहे. आज सकाळी पुन्हा या दोघांचा शोध घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे नवरा बायको साडूच्या घरी लग्नाला गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. लग्नाहून परततानाही दोघांचं भांडण सुरूच होतं. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याने संतप्त झालेल्या पत्नीने चालत्या बाईकवरून उडी घेतली. त्यानंतर धावतच तिने कालव्यात उडी घेतली. पत्नीने कालव्यात उडी घेतल्याने नवऱ्यानेही क्षणाचा विचार न करता कालव्यात उडी घेतली.

साडूच्या घरी लग्न

मानसिंह असं या व्यक्तिचं नाव आहे. तो माधौगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील नेवादा येथील रहिवासी आहे. त्याचा साडू बिलग्राम पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील अख्तियारपूर येथे राहतात. साडूच्या घरी लग्न समारंभ होता. या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता मानसिंह त्याची पत्नी आरतीसोबत आला होता.

बहिणीसोबत डान्स

लग्न सोहळ्यात आल्यानंतर आरती तिच्या बहिणींसोबत लग्नात डान्स करत होती. त्यावर मानसिंह याने आरतीला हटकले. पण तरीही आरती डान्स करत होती. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दोघेही आपल्या घराकडे जायला निघाले होते. बाईकवरून जात असतानाही दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडत होती. दोघे शारदा कालव्याच्या पुलावर आले होते. त्यावेळी अचानक दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. गाडी पुलावर आल्याने गाडीचा वेगही कमी झाला. तिच संधी साधत संतापलेली आरती बाईकवरून उतरली आणइ तिने तडक कालव्यात उडी घेतली.

कुटुंबीयांची पुलावर धाव

कालव्यात प्रचंड पाणी होतं. आरतीने उडी घेतल्याने मानसिंहनेही कालव्यात उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांसोबत मानसिंह आणि आरतीच्या कुटुंबीयांनी पुलावर धाव घेतली. जीवरक्षकांच्या मदतीने या दोघांचाही शोध सुरू आहे. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही. अप्पर पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत तपास सुरू केला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.