Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह सापडले, तरुणांसोबत काय घडलं?

काल सायंकाळी पोलीस कंट्रोल रुमला एक कॉल आला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतली. समुद्रकिनाऱ्यावर पोहचताच पोलिसांना खळबळजनक दृश्य समोर दिसले.

Mumbai Crime :  वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह सापडले, तरुणांसोबत काय घडलं?
वर्सोवा बीचवर दोन तरुणांचे मृतदेह आढळलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:24 AM

मुंबई / 4 ऑगस्ट 2023 : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणांकडे सापडलेल्या आधारकार्डवरुन तरुणांची ओळख पटली आहे. दीपक बिश्त (वय 25) आणि हरदेव सिंग (वय 26) अशी मयत तरुणांची नावे आहेत. दोघेही तरुण मूळचे हरियाणातील रहिवासी आहेत. मात्र तरुणांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वर्सोवा पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणांचा अपघाती मृत्यू झाला की त्यांची हत्या झाली हे स्पष्ट होईल. पोलीस नातेवाईकांची चौकशी करत आहेत.

आधारकार्डवरुन तरुणांची ओळख पटवली

वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर दोन तरुणांचे मृतदेह असल्याची माहिती लाईफ गार्डने काल सायंकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. दोन्ही मृतदेह 100 मीटरच्या अंतरावर पडले होते. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तरुणांच्या खिशात त्यांचे आधारकार्ड आणि सिम कार्ड सापडले. त्यावरुन त्यांची ओळख पटली आणि ते हरियाणातील असल्याचे कळले. पोलिसांनी सिम कार्डमधील नंबरवरुन त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे रहस्य उलगडेल

कुटुंबीयांशी संपर्क साधला असता दोघेही तरुण नागपूर आणि चेन्नई येथे कामाला असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. मग तरुण मुंबईत कसे आले? याबाबत पोलीस तपास करत आहेत. तरुणांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमी दिसत नाहीत. यामुळे तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला की त्यांचा घातपात झाला? याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतर सर्व स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.