AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमभंग, सासरी होणाऱ्या त्रासामुळे 5 महिन्यांत 26 आत्महत्या, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय ?

पिंपरी चिंचवडमध्ये मागील पाच महिन्यांत तब्बल 26 जणांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

प्रेमभंग, सासरी होणाऱ्या त्रासामुळे 5 महिन्यांत 26 आत्महत्या, पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय ?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 7:24 PM
Share

पुणे : सिने क्षेत्रातील नावाजले गेलेले कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड येथे आत्महत्या करत स्वत:ला संपवलं. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये मागील पाच महिन्यांत तब्बल 26 जणांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यात प्रेमभंग, सासरी होणारा त्रास ही प्रमुख कारणे आहेत. (Pimpri Chinchwad total 26 people committed suicide over 5 months)

5 महिन्यांत 26 जणांच्या आत्महत्या

प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पिंपरी चिंचवड येथील वाकडमध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येनंतर आता याच भागातील मागील पाच महिन्यांतील आत्महत्येची आकडेवारी समोर आली आहेत. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी आत्महत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील पाच महिन्यात पिंपरी चिंचवड भागात तब्बल 26 जणांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये प्रेमभंग, सासरी होणारा त्रास ही प्रमुख कारणे आहेत.

आव्हान, अपयश स्वीकारण्याची मानसिकता, सहनशीलता कमी

विशेष म्हणजे सध्याची कोरोना परिस्थिती आणि कोरोनामुळे मंदावलेले उद्योगधंदे या कारणामुळेसुद्धा अनेकांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये अनेक उच्च शिक्षितांनीही आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय. औद्योगीकरणामुळे नागरिकांची जीवनशैली बदलत आहे. तसेच वाढत्या धावपळीमुळे आव्हान, अपयश स्वीकारण्याची मानसिकता आणि सहनशीलता मात्र कमी होत आहे. याच कारणामुळे गळफास घेणे, नदीत उडी मारणे, जाळून घेणे असे आत्महत्येचे अनेक पर्याय निवडले जात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

पालघरमध्ये हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

मालकाने भाड्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 15 जुलै रोजी विरारमध्ये घडली. आत्महत्या करण्याचे कारण हे भाड्यासाठी तगादा लावणे हेच असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. करुणाकरण पुत्रण(Karunakaran Putraan, वय 48) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकांचे नाव असून, पुत्रण यांना दोन लहान मुलं आहेत. या घटनेमुळे विरार परिसरात खळबळ उडाली आहे. गळफास घेत पुत्रण यांनी स्वत:ला संपवलं आहे.

पुत्रण यांना हॉटेल व्यवसायात म्हणावा तेवढा फायदा झाला नाही

मिळालेल्या माहितीनुसार विरार पश्चिमेकडील वायके नगर परिसरात स्टार प्लॅनेट नावाचे एक हॉटेल आहे. हे हॉटेल करुणाकरण पुत्रण मागील काही दिवसांपासून चालवत होते. मात्र, यापूर्वी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि सध्याचे निर्बंध यामुळे पुत्रण यांना हॉटेल व्यवसायात म्हणावा तेवढा फायदा झाला नाही. ग्राहकच नसल्यामुळे पैसे मिळाले नाहीत. परिणामी हॉटेलचे भाडे थकले.

इतर बातम्या :

गळ्यातील दीड तोळ्याच्या सोन्याच्या चैनीवर मित्रांचा डोळा, संधी मिळताच हत्या, चैन घेऊन लंपास

रिक्षा भाड्याच्या वादातून प्रवाशांकडून आधी शाब्दिक चकमक, नंतर थेट मारहाण, रिक्षाचालक महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

काळ्या पिशवीत कोहळा, त्यावर टाचणी टोचून मुलीचा फोटो, शिरुरच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार, गावात खळबळ

(Pimpri Chinchwad total 26 people committed suicide over 5 months)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.