AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात जाणाऱ्या महिलेची दोन्ही पाय कापून हत्या, जोडव्यांच्या चोरीसाठी सशस्त्र हल्ला

45 वर्षीय कंकुबेई यांचा मृतदेह शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. धारदार शस्त्राने वार करुन त्यांच्या दोन्ही पायातील चांदीच्या जोडव्या काढण्यात आल्या होत्या. त्यांच्या शरीरभर जखम झाल्याच्या खुणा होत्या.

शेतात जाणाऱ्या महिलेची दोन्ही पाय कापून हत्या, जोडव्यांच्या चोरीसाठी सशस्त्र हल्ला
कूचबिहारमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 9:04 AM
Share

जयपूर : राजधानी जयपूरनंतर आता राजस्थानमधीलच राजसमंद गावामध्ये शेतात जाणाऱ्या महिलेचे दोन्ही पाय कापून चांदीच्या जोडव्या चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरोध केल्याने महिलेच्या मानेवरही वार करण्यात आले, त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानमधील राजसमंद येथील चारभुजा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अमरतिया गावात सोमवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 45 वर्षीय कंकुबेई यांचा मृतदेह शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. धारदार शस्त्राने वार करुन त्यांच्या दोन्ही पायातील चांदीच्या जोडव्या काढण्यात आल्या होत्या. त्यांच्या शरीरभर जखम झाल्याच्या खुणा होत्या. त्यावरुन महिलेने मृत्यूपूर्वी दरोडेखोरांना जोरदार प्रतिकार केल्याचं दिसत होतं.

सकाळीच महिला शेतावर निघालेली

नवऱ्याला जेवण देण्यासाठी कंकूबाई भल्या सकाळीच शेतात निघाल्या होत्या, मात्र पत्नी शेतात न पोहोचल्याने नवरा उपाशीपोटी घरी आला, तेव्हा आई सकाळीच जेवण घेऊन शेताकडे निघाल्याचे मुलांनी सांगितले.

शोध न लागल्याने कुटुंबीयांची पोलिसात धाव

अखेर चिंताग्रस्त कुटुंबीय कंकूबाई यांच्या शोधासाठी घराबाहेर पडले, मात्र रात्री उशिरापर्यंत कुठलीही माहिती त्यांना मिळाली नव्हती. त्यानंतर चारभुजा पोलिस ठाण्यात कंकूबाई बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. त्यावेळी, सकाळी शेतात एका झाडाखाली महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खून आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी एक संशयित दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

जोडव्या चोरीसाठी पाय कापल्याची दुसरी घटना

राजसमंदचे एसपी शिवलाल म्हणाले की, पोलिसांनी नाथद्वारा आणि अरमतिया चारभुजा येथील हत्या प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेतले आहे, लवकरच त्यांना अटक केली जाईल. काही दिवसांपूर्वी जयपूरमध्येही अशाच प्रकारे शेतात गुरे चरत असलेल्या महिलेचे पाय कापून चांदीच्या जोडव्या काढण्यात आल्या होत्या. राजस्थानच्या ग्रामीण भागात महिला हात आणि पायात चांदीचे अलंकार घालतात. दरोडेखोरांची त्यावर नजर पडल्याचं दिसत आहे. राज्यात एकामागून एक घडलेल्या या प्रकारच्या दोन घटनांमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे.

संबंधित बातम्या :

मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू

ठाण्यात उच्चभ्रू वस्तीत राहायची, पण निघाली चोर, महागडा लॅपटॉप चोरताना महिलेचं फुटलं बिंग

कौटुंबिक वादामुळे पारा चढला, शेवटी डॉक्टरने भावावरच केला गोळीबार, गुन्हा दाखल, अहमदनगर हादरलं !

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.