AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावयाने कमाल केली सासू पळून नेली… रोज 20 तास बोलायचे, लग्नाआधीच काय घडलं त्या घरात?

'माझी आईच माझं आयुष्य उद्ध्वस्त करुन गेली...', जावयासोबत सासू गेली पळून, लग्नाआधी 'त्या' घरात घडली थक्क करणारी घटना... पोलीस स्थानकात तक्रार दाखल... पोलीस करत आहेत कसून चौकशी...

जावयाने कमाल केली सासू पळून नेली... रोज 20 तास बोलायचे, लग्नाआधीच काय घडलं त्या घरात?
| Updated on: Apr 09, 2025 | 12:21 PM
Share

अलीगडमधील एका आईने असं काही केलं ज्याची कल्पनाही करता येणार नाही. लेकीचं लग्न ज्या पुरुषासोबत होणार होतं, त्याच्यासोबत आई पळून गेली. मुलीच्या लग्नाची तारिख जवळ येत असल्याचं लक्षात येताच आई जावयासोबत पळून गेली. दोघांत्या लव्ह कनेक्शनचं माध्यम होतं स्मार्टफोन… जो मुलीच्या आईला जावयाने भेट म्हणून दिलेला. दोघे एकमेकांसोबत 20 तासांपेक्षा अधिक वेळ गप्पा करत असायचे.

रोकड आणि दागिने घेवून सासू – जावई फरार…

ही घटना अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावातील आहे, जिथे जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्रची पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दोघांनी एकत्र पळ काढला आहे. दोघे घरातून जवळपास त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत.

जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु होती. नातेवाईकांना पत्रिका देखील पाठवण्यात आल्या होत्या. घरात आनंदी वातावरण होतं. पण अचानक पत्नी घरातून गायब झाली. पत्नी नातेवाईकांकडे पत्रिका देण्यासाठी गेली असावी.. असं जितेंद्र यांना वाटलं. पण असं काहीही नव्हतं.

त्यानंतर नवरा मुलगा देखील त्याच्या घरातून पळून गेला आहे… असं कळलं… अनेक ठिकाणी विरपूस केल्यानंतर, मोबाईलची माहिती मिळवल्यानंतर, एक धक्कादायक सत्य समोर आलं. पत्नी आणि होणारा जावई एकत्र पळून गेले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे काही दिवसांपूर्वी महिलेच्या जावयाने तिला एक महागडा स्मार्टफोन भेट दिला होता आणि त्याच फोनद्वारे दोघेही रात्रंदिवस संपर्कात राहिले.

मुलीचे वडील जितेंद्र म्हणाले, ‘मी बंगळुरूमध्ये काम करतो आणि महिन्यातून एक-दोन वेळा घरी येतो. मी मागच्या वेळी आलो तेव्हा मी पाहिले की माझी बायको माझ्या मुलीचे लग्न ज्या मुलाशी ठरले होते त्याच्याशी जास्त बोलत होती. पण मी दुर्लक्ष केलं…’

‘पण जेव्हा मला कळलं नवरा मुलगा दिवसातील 24 तासांमध्ये 20 – 22 तास सासूसोबत बोलतोय. माझ्या मुलीसोबत फार कमी बोलत आहे, तेव्हा संपूर्ण प्रकरण माझ्या लक्षात आलं. लग्नासाठी घरातील पैसे देखील घेवून गेली आहे. आता सर्वकाही संपलं आहे. माझ्या मुलीचं लग्न मोडलं आहे आणि माझी अभ्रू देखील गेली आहे…’

मुलगी शिवानी म्हणाली, ‘माझ्याच आईने माझं आयुष्या उद्ध्वस्तत केलं आहे. जेव्हा मी मुलाला विचारायची काय करतोय, तेव्हा त्याचं एकच उत्तर असायचं आणि ते म्हणजे लग्नाच्या कामात व्यस्त आहे. पण तो माझ्या आईसोबत व्यस्त असायचा. आई सर्वकाही त्याच्या सांगण्यावर केलं आहे. आता माझ्या आयुष्यात तिचं काहीही महत्त्व नाही. आम्हाला फक्त आमचं सामान हवं आहे…’

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यात फसवणूक, विश्वासघात आणि मालमत्तेची चोरी यासारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे. महिला आणि तरुणाचा शोध सुरु आहे. मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर शोध सुरु आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.