Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBSE Board Result 2021: 10 वी, 12 वीचा निकाल मान्य नसल्यास ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा देता येणार : केंद्रीय शिक्षण मंत्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांमधून मुल्याकन पद्धतीवर अनेक प्रश्न विचारले जात होते. त्याला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मोठी घोषणा केलीय.

CBSE Board Result 2021: 10 वी, 12 वीचा निकाल मान्य नसल्यास ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा देता येणार : केंद्रीय शिक्षण मंत्री
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 6:43 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांमधून मुल्याकन पद्धतीवर अनेक प्रश्न विचारले जात होते. त्याला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मोठी घोषणा केलीय. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी आणि 12 वीचा निकाल मान्य नसेल, त्या निकालावर समाधान नसेल त्यांच्यासाठी कोरोनाची परिस्थिती पाहून ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा घेण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे लेखी परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank announce physical exam in August 2021 for CBSE Board) .

रमेश पोखरीयाल निशंक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “अनेक दिवसांपासून विद्यार्थी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र, माझ्या प्रकृतीमुळे मला बोलता आले नाही. विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, मात्र त्यांनी कोणतीही काळजी करु नये. विद्यार्थ्यांच्या जीवाचा विचार करुन पंतप्रधान मोदींनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यात त्यांच्या क्षमतांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नसतील त्यांच्यासाठी ऑगस्टमध्ये ऐच्छिक परीक्षा आयोजित केली जाईल.”

सर्वोच्च न्यायालयाने देखील सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाला मान्यता दिल्याचं सांगत शिक्षण मंत्र्यांनी न्यायालयाचेही यासाठी आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेची काळजी न करता आपल्या आरोग्याची काळजी करावी, असं आवाहन केलं. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि क्षमता याच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

हेही वाचा :

11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार?

औरंगाबादेत शिक्षकांसाठी शाळेचे दार उघडले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ

व्हिडीओ पाहा :

Education Minister Ramesh Pokhariyal Nishank announce physical exam in August 2021 for CBSE Board

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.