AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-China: भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच चीनमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करता येणार! 20,000 हून अधिक विद्यार्थी अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत

चीनमध्ये 20,000 हून अधिक विद्यार्थी आपला अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात हे विद्यार्थी भारतात परतले होते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आता कोविड व्हिसा निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.

India-China: भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच चीनमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करता येणार! 20,000 हून अधिक विद्यार्थी अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत
GATE PreparationImage Credit source: istockphoto.com
| Updated on: Aug 14, 2022 | 3:57 PM
Share

भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच चीन (China) मध्ये परतून पुन्हा अभ्यास पूर्ण करता येणार आहे. भारतातील चीनचे राजदूत सन वेईडोंग म्हणाले की, येत्या भविष्यात भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी पुन्हा अभ्यास सुरू करेल. दोन्ही देशांचे संबंधित विभाग या दिशेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 (Covid-19) नंतर चीन सरकारकडून पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांचे देशात स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांची सरकारे एकत्र येऊन काम करत आहेत. कोविडच्या सुरुवातीपासूनच भारतीय विद्यार्थी (Indian Students) चीनमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी परत येऊ शकलेले नाहीत.

20,000 हून अधिक विद्यार्थी

भारतातील चीनचे राजदूत सुन वीडोंग म्हणाले, ‘चीन भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांची पहिली तुकडी चीनमध्ये अभ्यासाला सुरुवात करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये 20,000 हून अधिक विद्यार्थी आपला अभ्यास पुन्हा सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात हे विद्यार्थी भारतात परतले होते. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना आता कोविड व्हिसा निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.

भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीसाठी चीन काम करत आहे

चीनमधून परतणारे बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शाखेचे आहेत. अलीकडील घडामोडींनुसार, लवकरच विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास सुरू करता येईल, असा अंदाज बांधता येऊ शकतो. मंगळवारी झालेल्या मीडिया ब्रीफिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरळीत पुनरागमनासाठी चीन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. “परदेशी विद्यार्थ्यांना चीनमध्ये परत आणण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काम करत आहोत आणि भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे,” वांग वेनबिन यांनी येथे पत्रकारांना सांगितले. लवकरच सर्व परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा धोरण लागू करण्याविषयी काही चिनी मुत्सद्दींनी त्यांना सोशल मीडिया पोस्टबद्दल विचारले. “आम्हाला विश्वास आहे की आम्ही लवकरच भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे पुनरागमन पाहू” वांग म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.