इंडिया आघाडीने असा पलटला खेळ; 2019 च्या तुलनेत काँग्रेसला लक्षणीय फायदा

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी संध्याकाळी पार पडल्यानंतर उघड झालेल्या सर्व संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआला सरासरी 350 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

इंडिया आघाडीने असा पलटला खेळ; 2019 च्या तुलनेत काँग्रेसला लक्षणीय फायदा
INDIA blocImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 12:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आला होता. सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही भाजपविरोधी वातावरण नसल्याचा आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा फारसा प्रभाव निकालांवर पडणार नसल्याचा अंदाज या चाचण्यांमधून व्यक्त झाला होता. मात्र निवडणूक निकालाचे सुरुवातीचे आकडे पाहता 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ‘इंडिया’ आघाडी आणि विशेषत: काँग्रेससाठी लक्षणीय फायदा होणार असल्याचं दिसतंय. सकाळी 11 वाजेपर्यंत एनडीए 291 जागांवर आणि इंडिया आघाडी 226 जागांवर पुढे होती. 2019 मध्ये केवळ 52 जागा जिंकणारी काँग्रेस आता 98 लोकसभा मतदारसंघात आघाडीवर आहे.

मागच्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकून 272 चा टप्पा आरामात ओलांडून जबरदस्त विजय मिळवला होता. या पक्षाला एकूण मतांपैकी 37.36 टक्के मतं मिळाली होती. तर दुसरीकडे काँग्रेसला एकूण मतांपैकी 19.5 टक्के मतं मिळाली होती. आता सकाळी 11 वाजेपर्यंत समोर आलेल्या सुरुवातीच्या कलांनुसार, एनडीएला एकूण मतदानापैकी 44 टक्के आणि इंडिया आघाडीला 41 टक्के मतं मिळाली आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा स्ट्राइक रेट 54 टक्के होता, तर इंडिया आघाडीचा स्ट्राइक रेट 42 टक्के होता.

Lok Sabha Election Results 2024 Leading & Trailing LIVE : स्मृती इराणी किती हजार मतांनी पिछाडीवर?

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशात विरोधी पक्षांच्या आघाडीची स्थिती सकारात्मक दिसून येत आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार काँग्रेस-समाजवादी पक्ष 42 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 37 जागांवर आघाडीवर आहे. 2019 मध्ये भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मोठा विजय मिळवला होता. भाजपने त्यावेळी 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. तर अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या. समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने फक्त एकाच जागेवर विजय मिळवला होता.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.