AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खेळ उत्तर प्रदेशचा: ‘400 पार’च्या घोषणेचा उलटा परिणाम, मायावतीसह या 2 गोष्टींनी बिघडवला भाजपाचा खेळ

उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचं चित्र पहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपला सर्वाधिक नुकसान उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सहन करावा लागतोय. यामागची कारणं काय, ते जाणून घेऊयात..

खेळ उत्तर प्रदेशचा: '400 पार'च्या घोषणेचा उलटा परिणाम, मायावतीसह या 2 गोष्टींनी बिघडवला भाजपाचा खेळ
PM Narendra ModiImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2024 | 2:25 PM
Share

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपा प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत होताना दिसतेय. भाजपा 288 जागांवर आघाडीवर आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठताना दोघांचीही दमछाक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या आधी संसदेत भाजपासाठी 370 जागा आणि एनडीएसाठी 400 जागा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये अंतरिम बजेट सादर झाला. लोकसभा निवडणूक निकालाचं आतापर्यंतच चित्र पाहता, भाजपला सर्वाधिक नुकसान उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सहन करावा लागतोय. आतापर्यंत उत्तर प्रदेशात भाजपा फक्त 35 जागांवर आघाडीवर आहे. स्मृती इराणी, अनुप्रिया पटेल आणि चंदौली इथून महेंद्रनाथ पांडेय यांसारखे नेते पिछाडीवर आहेत.

‘400 पार’ घोषणेचा फटका

राजस्थानविषयी बोलायचं झाल्यास भाजपाने 2019 मध्ये जिथे क्लीन स्वीप केलं होतं, तिथे आतापर्यंत 14 जागांवरच आघाडीवर आहे. याठिकाणी काँग्रेसने आठ जागांवर आघाडी टिकवली आहे. बंगाल आणि बिहारमध्येही भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत आहेत. अशात प्रश्न हा आहे की अखेर भाजपाला उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये कमी जागा का मिळत आहेत? यावर निवडणूक विश्लेषकांचं असं मत आहे की भाजपाला ‘400 पार’ या घोषणेमुळे खूप नुकसान झालं आहे. या घोषणेमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अति-आत्मविश्वास आला आणि मतदारांवर अधिकाधिक प्रभाव पाडण्यासाठी जास्त प्रयत्न केले नाहीत.

त्याच त्याच उमेदवारांना संधी

उत्तर प्रदेशात भाजपावर नजर ठेवणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की भाजपाने राज्यातील अधिकाधिक जागांवर पुन्हा त्याच उमेदवारांना संधी दिली. यामुळे त्यांना फटका बसला. सुल्तानपूरमध्ये मेनका गांधी, चंदौलीमध्ये महेंद्रनाथ पांडेय यांसारख्या नेत्यांबाबत स्थानिक लोकांनी तक्रार केली होती की ते मतदारसंघात फार क्वचित फेरफटका मारतात. स्थानिक स्तरावर विकासाची कामंसुद्धा कमी केली आहेत. हे दिल्लीच्या उदाहरणावरूनही समजलं जाऊ शकतं. भाजपाने दिल्लीमधील उत्तर पूर्व मतदारसंघाशिवाय सर्व जागांवरील उमेदवार बदलले गेले. यामुळे दिल्लीत त्यांना थेट फायदा झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे त्याच त्याच उमेदवारांना संधी दिल्याचंही एक फॅक्टर आहे.

बसपाची मतं यावेळी सपाच्या खात्यात

मायावतीच्या पार्टीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 19 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवली होती आणि 10 जागा जिंकल्या होत्या. आतापर्यंतच्या कलांनुसार बसपा संपूर्ण उत्तर प्रदेशात शून्य आहे आणि टक्केवारीसुद्धा फक्त 9 च्या आसपास आहे. गेल्या निवडणुकीत सपाला 18 टक्के मतं मिळाली होती. ही टक्केवारी वाढून 31 टक्के झाली आहे. यामुळे हे स्पष्ट होतंय की बसपाची मतं यावेळी सपाच्या खात्यात गेली आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.