AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh Assembly Election 2022  : उत्तर प्रदेश निवडणूक सात टप्प्यात! कधी नामांकन, कधी मतदान?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाईल.

Uttar Pradesh Assembly Election 2022  : उत्तर प्रदेश निवडणूक सात टप्प्यात! कधी नामांकन, कधी मतदान?
निवडणूक आयुक्त सुशील चंद्र
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 5:20 PM
Share

नवी दिल्ली : 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उत्‍तर प्रदेश, पंजाब, उत्‍तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्र यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत या पाच राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाईल, याविषयी सविस्तर माहिती दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाईल.

उत्तर प्रदेशात निवडणुकीचे सात टप्पे कोणते?

403 विधानसभेच्या जागांसाठी उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होईल. ते पुढील प्रमाणे पहिला टप्पा- 10 फेब्रुवारी दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी तिसरा टप्पा- 20 फेब्रुवारी चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी सहावा टप्पा- 3 मार्च सातवा टप्पा- 7 मार्च 10 मार्च रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील.

पहिला टप्पा- 10 फेब्रुवारी रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 14 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 21 जानेवारी अर्ज पडताळणी- 24 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 27 जानेवारी मतदान- 10 फेब्रुवारी

दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 21 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 28 जानेवारी अर्ज पडताळणी- 29 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख-31 जानेवारी मतदान- 14फेब्रुवारी

तिसरा टप्पा- 28 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 25 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 01 जानेवारी अर्ज पडताळणी- 02 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 04 जानेवारी मतदान- 28 फेब्रुवारी

चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 27 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 03 फेब्रुवारी अर्ज पडताळणी-04 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 07 फेब्रुवारी मतदान- 23 फेब्रुवारी

पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 01 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 08 फेब्रुवारी अर्ज पडताळणी-09 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी मतदान- 27 फेब्रुवारी

सहावा टप्पा- 03 मार्च रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 04 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी अर्ज पडताळणी- 14 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 15 फेब्रुवारी मतदान- 03 मार्च

सातवा टप्पा- 07 मार्च रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 10 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 17 फेब्रुवारी अर्ज पडताळणी- 18 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 21 फेब्रुवारी मतदान- 07 मार्च

इतर बातम्या-

Assembly Election 2022 : 5 राज्यांसाठी क्रांतीकारी घोषणा- ना रोडशो, ना रॅली, ना पदयात्रा! आणखी कोणते नियम?

Assembly Election 2022 Full Schedule : 5 राज्य, 7 टप्पे, कधी मतदान? कधी निकाल? पाहा संपूर्ण वेळापत्रक

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.