Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte मालिकेत उत्कंठावर्धक वळण

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?
Madhurani Prabhulkar, Omkar Gowardhan
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 6:04 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती (Arundhati) ही रेकॉर्डिंगसाठी मुंबईबाहेर गेली आणि तिथे काही अडचणी आल्यामुळे तिला तिचा मित्र आशुतोषसोबत (Ashutosh) बाहेर रात्र काढावी लागली. या घटनेनंतर अनिरुद्ध आणि कांचन देशमुख तिच्या चारित्र्यावर संशय घेतात. अरुंधती अखेर देशमुख कुटुंबातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयाचं प्रेक्षकांकडून, चाहत्यांकडून बरंच कौतुक झालं. दुसरीकडे याच परिस्थितीचा फायदा घेत संजना ही कांचन देशमुखांना अरुंधतीविरोधात भडकवते. भररस्त्यात कांचन देशमुख अरुंधतीला तिचा घरावरचा हक्क सोडायला भाग पाडतात. अरुंधतीसुद्धा मागचापुढचा विचार न करता घरावरील तिचे हक्क सासूंच्या नावे करते. यानंतर आता मालिकेत आणखी मोठा ट्विस्ट येणार आहे.

देशमुखांच्या घराबाहेर पडल्यानंतर अरुंधती पुढे कोणतं पाऊल उचलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. बुधवारी प्रसारित होणाऱ्या भागात अरुंधती तिच्या आईच्या घरी जाते. यावेळी आई आणि सुधीर अरुंधतीची बाजू घेत तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सांगतात. त्यानंतर यश, नितीन आणि आशुतोष हे अरुंधतीला भेटायला येतात. ‘माझं चुकलं, मी काहीही सहन करेन, करते, असा समज मी करून दिला होता त्यांचा…’ असं म्हणत अरुंधतीसुद्धा तिच्या निर्णयावर ठाम राहते. दुसरीकडे विशाखा आणि केदार हे अनिरुद्ध आणि कांचन यांची चांगलीच कानउघडणी करतात.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आशुतोष देणार अरुंधतीवरील प्रेमाची कबुली मालिकेच्या पुढील भागांत आशुतोष हा अखेर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली चक्क देशमुख कुटुंबीयांसमोर देणार आहे. आता त्यावर देशमुख कुटुंबीय, विशेषकरून अनिरुद्ध आणि कांचन यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. इतकंच नव्हे तर अरुंधतीला समजल्यानंतर ती काय बोलणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून असेल. अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करणार की त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांत पहायला मिळेल.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.