AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार?

दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार?
| Updated on: Dec 27, 2020 | 10:04 AM
Share

मुंबई : दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agstya Nanda) बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. श्वेता बच्चनला (Shweta Bachchan) तिची मुलगी नव्याच्या बॉलीवूड करिअरबद्दल नेहमीच विचारणा करण्यात येते. मात्र, आता बिग बीचा नातू अगस्त्य हाच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार आहे. रिपोर्ट्सनुसार श्वेता नंदा आणि निखिल नंदाचा मुलगा अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर नव्याचे फोटो पहात राहतो आणि श्वेताला तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारतो. (Amitabh Bachchan’s grandson Agastya Nanda will be coming to Bollywood)

ज्यावर श्वेता नेहमीच म्हणते की, नव्यासाठी बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी हे योग्य वय नाही. पण आता अगस्त्य कॅमेर्‍यासमोर येण्यासाठी तयार असल्याचे दिसते. चित्रपट निर्माते लवकरच अगस्त्यासोबत चित्रपटाची घोषणा करू शकतात.

अगस्त्य सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. त्याच्या प्रत्येक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्याने काही वर्षांपूर्वी आपल्या मित्रांसह एक लघु फिल्म देखील बनवला होता. अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर एक कविता शेअर केली होती. मात्र, त्या कवितेमुळे अमिताभ बच्चन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून चहावर एक कविता शेअर केली होती मात्र, टिशा अग्रवाल नावाच्या एका महिलेचा असा दावा आहे की, अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली कविता तिने लिहिलेली आहे.

याबद्दल अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवरही टिशाने कॅमेंट केली आहे- “सर, तुमच्या वॉलवर माझी कविता येणे हे माझे भाग्यच आहे, परंतू तुम्ही या कवितेला माझे नाव दिले असते तर मला खूप आनंद झाला असता, मला आशा आहे की, तुम्ही यावर उत्तर नक्की द्याल. यानंतर एका ट्रोलर्सने अमिताभ बच्चन यांना आठवण करून दिले की, जेव्हा कुमार विश्वास यांनी त्यांच्या कवितांमध्ये हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी वापरल्या तेव्हा तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होते. आणि तुम्हीच जर टिशाचे श्रेय तिला देत नाहीत हे काय आहे? त्याचप्रमाणे अनेक जणांनी अमिताभ बच्चन यांना टिशाला तिच्या कवितेचे श्रेय द्यावे अशी विनंती केली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, 30 एप्रिल 2020 रोजी ही कविता लिहिल्याचे टिशा अग्रवालचे म्हणणे आहे. जेव्हा अमिताभ बच्चन यांची पोस्ट तिने पाहिली तेव्हा तिच्या लक्षात आले की, अमिताभ बच्चन यांनी तिची कविता शेअर केली आहे.

संबंधित बातम्या : 

बर्थ डे बॉय Salman Khan | रेंज रोवर, ऑडी, बीएमडब्ल्यू जो खेळण्यासारखा वापरतो, वाचा नेमकी संपत्ती किती?

Gauahar Khan : रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री गौहर खाननं ‘झल्ला-वल्ला’ वर धरला ठेका, डान्स व्हिडीओ व्हायरल

(Amitabh Bachchan’s grandson Agastya Nanda will be coming to Bollywood)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.