AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर ‘या’ खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता

अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट त्यावेळी खूप चर्चेत होता. लग्नाच्या 13 वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले होतं. परंतु सैफशी घटस्फोटानंतर नाही तर आयुष्यातील दुसरी एक महत्त्वाची व्यक्ती गमावल्यानंतर अमृता पूर्णपणे खचली होती.

सैफशी घटस्फोटामुळे नाही तर 'या' खास व्यक्तीला गमावल्यानंतर पूर्णपणे खचली होती अमृता
Saif Ali Khan and Amrita SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2025 | 10:00 AM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही जोडप्यांच्या घटस्फोटाची चर्चा आजसुद्धा होते. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग. या दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं होतं. अमृता आणि सैफच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. सैफ हा अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. या दोघांचे धर्मही वेगळे आहेत. नात्यातील मतभेदांमुळे आणि सततच्या भांडणांमुळे या दोघांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या 13 वर्षांनंतर 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अमृताला त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा अमृताने अशी कबुली दिली होती की, घटस्फोट नव्हे तर दुसऱ्या एका घटनेचा तिच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता, ज्यामुळे ती पूर्णपणे खचली होती.

अभिनेत्री पूजा बेदीच्या टॉक शोमध्ये अमृताने हजेली लावली होती. या शोमध्ये पूजाने अमृताला तिच्या घटस्फोटाविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर अमृताने सांगितलं की, घटस्फोट नाही तर तिच्या आईचं निधन हा आयुष्यातील सर्वांत कठीण काळ होता. “माझ्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळ तो होता, जेव्हा माझी आई मला सोडून गेली. ती माझ्या आयुष्याचा स्तंभ आणि माझी ओळख होती. आईशिवाय माझं कोणीच जवळचं नव्हतं. तसं पाहिलं तर आईशिवाय माझं दुसरं कोणतं कुटुंबच नव्हतं. मी एका विभक्त कुटुंबातून होते आणि माझे कोणीत भाऊ-बहीण नाहीत. माझ्याकडे फक्त आई होती आणि तिला गमावणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होतं”, अशा शब्दांत अमृताने भावना व्यक्त केल्या.

View this post on Instagram

A post shared by Amrita Singh (@amrita40_)

याविषयी ती पुढे म्हणाली, “नंतर जेव्हा इब्राहिम आजारी पडला होता, तेव्हा माझ्या आयुष्यातील दुसरा सर्वांत कठीण काळ होता. त्यामुळे माझा घटस्फोट हा या यादीत त्याअर्थी बऱ्याच अंशी खाली आहे.” अमृता आणि सैफ यांना दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोघांनीही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलंय. सैफशी घटस्फोटानंतर अमृतानेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तिने दुसरं लग्न केलं नाही. तर दुसरीकडे सैफने अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केलं. या दोघांनाही तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.