AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16: चुकीला माफी नाही; केवळ ‘हा’ शब्द म्हटल्याने बिग बॉसकडून स्पर्धकांना शिक्षा

बिग बॉसचा अंदाज बदलला; स्पर्धकांना करता येणार नाही मनमानी

Bigg Boss 16: चुकीला माफी नाही; केवळ 'हा' शब्द म्हटल्याने बिग बॉसकडून स्पर्धकांना शिक्षा
Tina Dutta and Manya SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 03, 2022 | 6:41 PM
Share

बिग बॉसच्या सोळाव्या सिझनची (Bigg Boss 16) धमाकेदार सुरुवात झाली आहे. यंदाचा सिझन हा मागच्या सिझन्सपेक्षा बराच वेगळा आणि अनोखा आहे. बिग बॉस या शोच्या इतिहासात पहिल्यांदाच या सिझनमध्ये प्रेक्षकांना अशा काही गोष्टी पहायला मिळाल्या आहेत, ज्याची कधी कल्पनाही केली नसावी. नव्या शोमध्ये बिग बॉसचा (Bigg Boss) अंदाज पूर्णपणे बदलला आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांच्या प्रत्येक गोष्टीवर बिग बॉस बारकाईने लक्ष देत आहे. यंदाचा सिझनमध्ये स्पर्धकांना कठोर वागणूक दिली जाणार आहे. हेच पहिल्या एपिसोडमध्ये पहायला मिळालं.

स्पर्धकांच्या हलगर्जीपणाला, छोट्यातल्या छोट्या चुकीला आता बिग बॉसकडून माफी मिळणार नाही. या नव्या सिझनची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचाच प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

इतर स्पर्धकांना नॉमिनेट केल्यानंतर टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि मान्या सिंह त्यांना ‘सॉरी’ म्हणतात. नॉमिनेशन प्रक्रियेत सॉरी बोलणं बिग बॉसला अजिबात आवडलं नाही. “या घरात काही महान लोक आहेत, ज्यांना मी सॉरी म्हणताना ऐकलंय. बिग बॉसकडून या तिघांना सॉरी म्हटल्याबद्दल शिक्षा दिली जातेय. बिग बॉसच्या पुढच्या आदेशापर्यंत या तिघांना घरातील सर्व कामं करावी लागणार आहेत”, असं बिग बॉसकडून सांगण्यात आलं.

शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये बिग बॉने कॅप्टन्सीवरून स्पर्धकांना झटका दिला. यंदा घरातील कॅप्टनवर स्वत: बिग बॉसची 24 तास नजर असणार आहे. जर कॅप्टन त्याची ड्युटी बजावण्यात चुकला तर घरात एक रिंग वाजवली जाई आणि त्याला कॅप्टन्सी पदावरून हटवलं जाईल. हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्यामुळे यंदा कॅप्टनलाही आराम करता येणार नाही.

बिग बॉस 16 मध्ये स्पर्धकांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये स्पर्धक नियम मोडताना, हट्टीपणा करताना दिसले. मात्र यावेळी स्पर्धकांचा मनमानी कारभार चालणार नाही, हे बिग बॉसने पहिल्याच एपिसोडमध्ये स्पष्ट केलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.