AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!

एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!
Bajrangi Bhaijan 2
| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 10:32 AM
Share

मुंबई : एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. RRR चा प्री-रिलीज कार्यक्रम रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील उपस्थित होता.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सलमान खान थेट विमानतळावरून आला. तर, इथेच त्याने एक खास घोषणा केली आहे, ज्यानंतर त्याचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. सलमानने ‘बजरंगी भाईजान’ (Bajrangi Bhaijaan 2 ) या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.

‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल बनवणार!

‘बजरंगी भाईजान’ हा सलमान खानच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. आता तो या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट एसएस राजामौली यांचे वडील विजेंद्र प्रसाद लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी याची पटकथाही लिहिली आहे.

राजामौलीच्या वडिलांबद्दल बोलताना सलमान खानने अचानक ही गोष्ट सर्वांना सांगितली. सलमान खान म्हणाला की, राजामौली यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट दिला आहे. याला उत्तर देताना चित्रपट निर्माता करण जोहरने विचारले की, तुम्ही या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत आहे का? यावर सलमान म्हणाला- हो करण. बजरंगी भाईजानने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींची कमाई केली होती आणि आतापर्यंत बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘टॉप 5’ चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश आहे.

‘बजरंगी भाईजान 2’ची अधिकृत घोषणा!

यापूर्वी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत केव्ही विजेंद्र प्रसाद यांनी सांगितले होते की, बजरंगी भाईजानच्या सिक्वेलसाठी ते एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, मी ‘बजरंगी भाईजान 2’ क्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मी सलमानला याची कल्पना दिली आणि तो खूप उत्साहित आहे. पण, मी ते योग्य मार्गाने करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा मी सलमानला अशा प्रकारे भेटलो तेव्हा मी त्याला बजरंगी भाईजानच्या सिक्वेलची कल्पना दिली आणि हे जाणून त्याला खूप आनंद झाला.

‘बजरंगी भाई’जानचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 17 जुलै 2015 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा :

83 : दिग्दर्शक कबीर खाननं केला खुलासा; म्हणाला, चित्रपट पाहताना रडत होती दीपिका पदुकोण

Disha Patani Photoshoot: अभिनेत्री दिशा पाटनीच्या बोल्ड लूकने वाढला इंटरनेटचा पारा!

Oo Antava : समंतानं रिजेक्ट केलं होतं गाणं, कुणी आणि कशी काढली तिची समजूत?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.